शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

विरोध झुगारून थेट खरेदीची अधिसूचना

By admin | Updated: May 4, 2017 00:18 IST

समृद्धी : बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक रक्कम

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविलेला असताना, शासन मात्र महामार्गासाठी जागा संपादित करण्यावर ठाम असून, जागामालक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक रक्कम देऊन थेट जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात देऊन महामार्गात जाणारे गटही अंतिमत: जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, यापूर्वी संयुक्त मोजणी दरम्यानही शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करून मोजणी बंद पाडली. तथापि, फक्त जागा मोजणी करू द्या, ती संपादित करायची किंवा नाही याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल, असे आश्वासन महसूल खात्याकडून दिले गेले तर शेतकऱ्यांच्या मोजणीसाठी हरकती नोंदवून जागा मोजणीचे काम करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात शंभर टक्के मोजणी पूर्ण झाली असली तरी, सिन्नर तालुक्यात मात्र पाच ते सहा गावांची मोजणी अपूर्ण आहे. तेथेही अधिकाऱ्यांनी फक्त मोजणी करू देण्याची गळ जागा मालक शेतकऱ्यांना घालण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष जागा घेण्यापूर्वी शाासनाकडून जागा मालक शेतकऱ्यांशी बोलणी करून काही तरी सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून होते, मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधाची पर्वा न करता समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जागांचे गावनिहाय गट व आकारमान प्रसिद्ध करून थेट जागा खरेदीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार ज्या शेतकऱ्यांना महामार्गासाठी जागा द्यायची आहे अशांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील व निफाडचे प्रांत महेश पाटील या दोघा उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांच्या कार्यालयात या संमतीपत्राचे नमुने ठेवण्यात आले आहेत. शिवाय ज्या जागांच्या थेट खरेदीचा विचार समृद्धी महामार्गासाठी केला जात आहे, त्या जागांच्या मालकी हक्काबाबत वा देव-घेवीबाबत काही वाद असतील तर अशा व्यक्तींनादेखील हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागांचे मूल्यांकन सुरूसमृद्धीसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या जागांचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी तलाठ्यांमार्फत गेल्या तीन वर्षांत गावात झालेल्या व्यवहारांची माहिती संकलित केली जात असून, दुय्यम निबंधकांकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी जमिनीच्या दराची सरासरी काढून मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे.