शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

त्र्यंबकेश्वर मंदिरात नारळ, फुले, प्रसाद नेण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 00:08 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येताना हार, फुले, नारळ या वस्तूंना मंदिरात नेण्यास यापुढे बंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत ट्रस्टच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना पूजा साहित्याला मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देनिर्णयामुळे नाराजी : छोट्या व्यावसायिकांची होणार अडचण

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येताना हार, फुले, नारळ या वस्तूंना मंदिरात नेण्यास यापुढे बंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत ट्रस्टच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना पूजा साहित्याला मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात कोरोनामुळे पुजारीवगळता अन्य भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत साधू-महंत आक्रमक झाले असतानाच आता मंदिरात फुले, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोना काळात जवळपास दीड वर्ष मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच दरवाजे उघडले जाताच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्र्यंबकेश्वर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जातांना सोबत फुले, नारळ, प्रसाद घेऊन जाण्यास ट्रस्टने मनाई केली आहे.फुले, नारळ, प्रसादाला बंदी करण्यामागे कोरोनाचे सुरक्षा नियम असल्याचे कारण देवस्थान ट्रस्ट सांगत आहे. मात्र इतर सर्व सुरक्षेचे नियम तोडले जात असतांना केवळ फुलांना बंदी केली जात असल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रांगणाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच भाविकांच्या हातात असलेली फुलांची परडी काढून घेतली जात आहे. दरम्यान प्रवेशद्वारात असलेली धातू शोधक सुरक्षा चौकट मात्र बंद आहे, ती यंत्रणा दुरुस्त करुन भाविकांना सुरळीत प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे.देवाच्या दर्शनाला हजारो किलोमीटर अंतरावरुन आलेला भाविक काही तास दर्शनासाठी रांगेत प्रतीक्षा करतो. काही भाविक दोनशे रूपयांची पावती देतात व नंतर केवळ गर्भगृहाच्या चौकटीपाशी उभे राहून हात जोडत काही सेकंदात तेथून निघून जात असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. तीर्थस्थळ परिसरातील अर्थव्यवस्था, रोजगार नारळ, फुले, प्रसाद यावर अवलंबून असते. नेमकी त्यांनाच बंदी घातल्याने छोटे व्यावसायिक मात्र धास्तावले आहेत.