शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यास मनाई

By admin | Updated: December 8, 2015 00:20 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : निर्भयच्या जनहित याचिकेवर सुनावणी

नाशिक : राज्य शासनाचे शिक्षण खाते शाळांना वेतनेतर अनुदान देत नसल्याने अनेक शाळा संकटात असून, थकीत वेतनासाठी वीजपुरवठा खंडित करीत आहेत. मात्र उच्च न्यायालयाने वीज मंडळास अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कारवाई करण्यास मनाई केली आहे. नाशिकच्या निर्भय फाउंडेशनच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देतानाच हे निर्देश दिले आहेत.राज्य शासनाने २००४ पासून अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. त्यामुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत. अनुदानावर अवलंबून असलेल्या शाळांना वीज बिल, घरपट्टी आणि अन्य कर भरता येत नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात महापालिकेने घरपट्टी थकलेल्या अनेक शाळांना मिळकत जप्त करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच महापालिका शिक्षण मंडळाकडून वीज बिल थकल्याने शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हाच संदर्भ घेऊन निर्भय फाउंडेशनचे संस्थापक मनोज पिंगळे आणि अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी उच्च न्यायालयात राज्यातील अनुदानित शाळांच्या अडचणीसंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाने मान्य केले असून, तसा कायदा केला आहे. मात्र तरीही वेतनेतर अनुदान न दिल्याने अशाप्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागत असून, त्यातून शिक्षणात व्यत्यय येऊन त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. राज्य शासनाने अशा स्थितीत अनुदान शाळांना न देता वीज मंडळ, मनपाला परस्पर देयके अदा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. शिक्षण मंडळाच्या शाळांवरील झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने कोठेही शाळांकडे अशी थकबाकी आहे, म्हणून त्यांच्यावर वीज कंपनीने पुरवठा खंंडित करण्याची कारवाई करू नये अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात महावितरणला प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायमूर्तींनी दिले आहेत.