शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यास मनाई

By admin | Updated: December 8, 2015 00:20 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : निर्भयच्या जनहित याचिकेवर सुनावणी

नाशिक : राज्य शासनाचे शिक्षण खाते शाळांना वेतनेतर अनुदान देत नसल्याने अनेक शाळा संकटात असून, थकीत वेतनासाठी वीजपुरवठा खंडित करीत आहेत. मात्र उच्च न्यायालयाने वीज मंडळास अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कारवाई करण्यास मनाई केली आहे. नाशिकच्या निर्भय फाउंडेशनच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देतानाच हे निर्देश दिले आहेत.राज्य शासनाने २००४ पासून अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. त्यामुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत. अनुदानावर अवलंबून असलेल्या शाळांना वीज बिल, घरपट्टी आणि अन्य कर भरता येत नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात महापालिकेने घरपट्टी थकलेल्या अनेक शाळांना मिळकत जप्त करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच महापालिका शिक्षण मंडळाकडून वीज बिल थकल्याने शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हाच संदर्भ घेऊन निर्भय फाउंडेशनचे संस्थापक मनोज पिंगळे आणि अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी उच्च न्यायालयात राज्यातील अनुदानित शाळांच्या अडचणीसंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाने मान्य केले असून, तसा कायदा केला आहे. मात्र तरीही वेतनेतर अनुदान न दिल्याने अशाप्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागत असून, त्यातून शिक्षणात व्यत्यय येऊन त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. राज्य शासनाने अशा स्थितीत अनुदान शाळांना न देता वीज मंडळ, मनपाला परस्पर देयके अदा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. शिक्षण मंडळाच्या शाळांवरील झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने कोठेही शाळांकडे अशी थकबाकी आहे, म्हणून त्यांच्यावर वीज कंपनीने पुरवठा खंंडित करण्याची कारवाई करू नये अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात महावितरणला प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायमूर्तींनी दिले आहेत.