शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यास मनाई

By admin | Updated: December 8, 2015 00:20 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : निर्भयच्या जनहित याचिकेवर सुनावणी

नाशिक : राज्य शासनाचे शिक्षण खाते शाळांना वेतनेतर अनुदान देत नसल्याने अनेक शाळा संकटात असून, थकीत वेतनासाठी वीजपुरवठा खंडित करीत आहेत. मात्र उच्च न्यायालयाने वीज मंडळास अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कारवाई करण्यास मनाई केली आहे. नाशिकच्या निर्भय फाउंडेशनच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देतानाच हे निर्देश दिले आहेत.राज्य शासनाने २००४ पासून अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. त्यामुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत. अनुदानावर अवलंबून असलेल्या शाळांना वीज बिल, घरपट्टी आणि अन्य कर भरता येत नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागत आहे. नाशिक शहरात महापालिकेने घरपट्टी थकलेल्या अनेक शाळांना मिळकत जप्त करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच महापालिका शिक्षण मंडळाकडून वीज बिल थकल्याने शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हाच संदर्भ घेऊन निर्भय फाउंडेशनचे संस्थापक मनोज पिंगळे आणि अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी उच्च न्यायालयात राज्यातील अनुदानित शाळांच्या अडचणीसंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाने मान्य केले असून, तसा कायदा केला आहे. मात्र तरीही वेतनेतर अनुदान न दिल्याने अशाप्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागत असून, त्यातून शिक्षणात व्यत्यय येऊन त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. राज्य शासनाने अशा स्थितीत अनुदान शाळांना न देता वीज मंडळ, मनपाला परस्पर देयके अदा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. शिक्षण मंडळाच्या शाळांवरील झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने कोठेही शाळांकडे अशी थकबाकी आहे, म्हणून त्यांच्यावर वीज कंपनीने पुरवठा खंंडित करण्याची कारवाई करू नये अशी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात महावितरणला प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायमूर्तींनी दिले आहेत.