शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

चाळीतच कांद्याला हमीभाव देऊन खरेदी करण्याची उत्पादकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

खडकी : अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत असले तरी त्यातून मिळणारा भाव हा साठवणूक केलेला कांद्याला मिळत ...

खडकी : अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत असले तरी त्यातून मिळणारा भाव हा साठवणूक केलेला कांद्याला मिळत आहे. कारण लाल कांद्याचेही उत्पादन कमी असल्याने त्याचा बाजारभाव स्थिर नसतो. स्थिर बाजारभावासाठी शेतकऱ्यांना योग्य त्या योजनेचा वापर करून किंवा त्याच्या चाळीतच हमीभावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून केली जात आहे.

कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या कांदा चाळ उभारणीसाठीचा निधी उभारणीअगोदर मिळाल्यास त्याचा आधार शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी प्रोत्साहननिधी ३ हजार ५०० रुपये टन याप्रमाणे २५ टन कांदा साठवणुकीसाठी ८७ हजार पाचशे रुपये निधी दिला जातो. मात्र, हा निधी हा कांदाचाळ उभारणी केल्यानंतर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांतून कांदा चाळ उभारणी करावी लागत आहे. आर्थिक दुर्बल किंवा अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने कांदाचाळ उभारणी सुरुवातीचा खर्च होत नसल्याने कांदा चाळ बऱ्याच शेतकऱ्यांनी निधीअभावी नाकारली आहे. यादृष्टीने धावते रक्कम या अनुषंगाने टप्प्या-टप्प्याने कांदाचाळ उभारणी करत असताना शेतकऱ्यांना या रकमेची अदा करणे गरजेचे आहे.

कृषी विभागाने निश्चित केलेल्या कांदाचाळी तांत्रिकदृष्ट्या पूर्णत: सफल नसल्याने माळमाथ्यासारख्या भागात अती उष्णतेचा परिणाम होऊन कांदा चाळीतील कांदा सोडून खराब होतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. कारण हा कांदा हा खराब होईल यामुळे कमी भावात विकावा लागत आहे. यादृष्टीने सदर चाळी वातानुकुलितदृष्ट्या कशी निर्माण करता येईल याविषयी संशोधन करून कृषी विभागाने कांदाचाळीचे नियोजन करावे अन्यथा कांदाचाळीची दिलेले अनुदानही शेतकऱ्यांना फारसे लाभदायक ठरणार नाही.

मालेगाव, बागलाण तालुक्यात उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मात्र त्यादृष्टीने उत्पादन करता क्षणी उत्पादनाला कमी भाव असतो. त्यामुळे कांदा साठवून ठेवण्याची तरतूद शासन व शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, इतर धान्याच्या वेअरहाऊस किंवा आदी वातानुकूलित गोदामे धान्याला सुरक्षित ठेवू शकतो. त्याप्रमाणात कांदाचाळीची रचना अतिशय साध्या पद्धतीने असलेले वातावरण वातानुकूलित नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवणीत सोयीचे असले तरी ते फारसे लाभदायक नाही.

आजच्या घडीला कांद्याचे भाव पंधराशेवर स्थिर झाले आहे .उत्पादनाचे घट बघता शेतकऱ्यांना दर परवडणारे नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे भाव वाढलेले नाही. कांदा साठवून ठेवूनही फार मोठा लाभ झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाल कांद्याच्या लागवडीकडे लक्ष घातले आहे. मात्र, पावसाने झडी लावल्याने कांद्याची रोपे व लावलेली कांदे ही खराब होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या ऋतूत कांदा कमी प्रमाणात येऊन भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

इन्फो...

मोठ्या चाळींची आवश्यकता

कांदा चाळ उभारणीचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायी असला तरी तो परिपूर्णता यशस्वी करण्यासाठी त्यातील थोडे दोषांमध्ये तांत्रिकदृष्ट्या बदल करून कांदा चाळ उभारणी गरजेचे आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात एकदम साध्या पद्धतीने कांदा चाळ उभारतो. त्यात चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत नसून नुकसान कमी होते. शेतकरी लाकूड तसेच उसाचे पाचट किंवा बॅनर आधी पद्धतीने कांदाचाळीची उभारणी करतो. त्या चाळीतील कांदा कुठल्याही दृष्टीने खराब होत नाही. मात्र, त्याची धारण क्षमता कमी असल्याने या चाळीमधील कांदा ५० ते १०० क्विंटल पेक्षा जास्त साठवू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या चाळींची आवश्यकता पडत आहे.