शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

चाळीतच कांद्याला हमीभाव देऊन खरेदी करण्याची उत्पादकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

खडकी : अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत असले तरी त्यातून मिळणारा भाव हा साठवणूक केलेला कांद्याला मिळत ...

खडकी : अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत असले तरी त्यातून मिळणारा भाव हा साठवणूक केलेला कांद्याला मिळत आहे. कारण लाल कांद्याचेही उत्पादन कमी असल्याने त्याचा बाजारभाव स्थिर नसतो. स्थिर बाजारभावासाठी शेतकऱ्यांना योग्य त्या योजनेचा वापर करून किंवा त्याच्या चाळीतच हमीभावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून केली जात आहे.

कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या कांदा चाळ उभारणीसाठीचा निधी उभारणीअगोदर मिळाल्यास त्याचा आधार शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी प्रोत्साहननिधी ३ हजार ५०० रुपये टन याप्रमाणे २५ टन कांदा साठवणुकीसाठी ८७ हजार पाचशे रुपये निधी दिला जातो. मात्र, हा निधी हा कांदाचाळ उभारणी केल्यानंतर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांतून कांदा चाळ उभारणी करावी लागत आहे. आर्थिक दुर्बल किंवा अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने कांदाचाळ उभारणी सुरुवातीचा खर्च होत नसल्याने कांदा चाळ बऱ्याच शेतकऱ्यांनी निधीअभावी नाकारली आहे. यादृष्टीने धावते रक्कम या अनुषंगाने टप्प्या-टप्प्याने कांदाचाळ उभारणी करत असताना शेतकऱ्यांना या रकमेची अदा करणे गरजेचे आहे.

कृषी विभागाने निश्चित केलेल्या कांदाचाळी तांत्रिकदृष्ट्या पूर्णत: सफल नसल्याने माळमाथ्यासारख्या भागात अती उष्णतेचा परिणाम होऊन कांदा चाळीतील कांदा सोडून खराब होतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. कारण हा कांदा हा खराब होईल यामुळे कमी भावात विकावा लागत आहे. यादृष्टीने सदर चाळी वातानुकुलितदृष्ट्या कशी निर्माण करता येईल याविषयी संशोधन करून कृषी विभागाने कांदाचाळीचे नियोजन करावे अन्यथा कांदाचाळीची दिलेले अनुदानही शेतकऱ्यांना फारसे लाभदायक ठरणार नाही.

मालेगाव, बागलाण तालुक्यात उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मात्र त्यादृष्टीने उत्पादन करता क्षणी उत्पादनाला कमी भाव असतो. त्यामुळे कांदा साठवून ठेवण्याची तरतूद शासन व शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, इतर धान्याच्या वेअरहाऊस किंवा आदी वातानुकूलित गोदामे धान्याला सुरक्षित ठेवू शकतो. त्याप्रमाणात कांदाचाळीची रचना अतिशय साध्या पद्धतीने असलेले वातावरण वातानुकूलित नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवणीत सोयीचे असले तरी ते फारसे लाभदायक नाही.

आजच्या घडीला कांद्याचे भाव पंधराशेवर स्थिर झाले आहे .उत्पादनाचे घट बघता शेतकऱ्यांना दर परवडणारे नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे भाव वाढलेले नाही. कांदा साठवून ठेवूनही फार मोठा लाभ झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाल कांद्याच्या लागवडीकडे लक्ष घातले आहे. मात्र, पावसाने झडी लावल्याने कांद्याची रोपे व लावलेली कांदे ही खराब होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या ऋतूत कांदा कमी प्रमाणात येऊन भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

इन्फो...

मोठ्या चाळींची आवश्यकता

कांदा चाळ उभारणीचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायी असला तरी तो परिपूर्णता यशस्वी करण्यासाठी त्यातील थोडे दोषांमध्ये तांत्रिकदृष्ट्या बदल करून कांदा चाळ उभारणी गरजेचे आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात एकदम साध्या पद्धतीने कांदा चाळ उभारतो. त्यात चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत नसून नुकसान कमी होते. शेतकरी लाकूड तसेच उसाचे पाचट किंवा बॅनर आधी पद्धतीने कांदाचाळीची उभारणी करतो. त्या चाळीतील कांदा कुठल्याही दृष्टीने खराब होत नाही. मात्र, त्याची धारण क्षमता कमी असल्याने या चाळीमधील कांदा ५० ते १०० क्विंटल पेक्षा जास्त साठवू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या चाळींची आवश्यकता पडत आहे.