शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

महापालिकेकडून प्रक्रिया सुरू : ‘कपाट’चा प्रश्न लागणार मार्गी अनधिकृत बांधकामे होणार नियमानुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:21 IST

महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या खजिन्यात दीडशे कोटी रुपये उत्पन्न भोगवटाधारककडून प्रस्ताव मागविले सुमारे ३० ते ४० टक्के प्रकरणे मार्गी

नाशिक : महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील प्रलंबित असलेला ‘कपाट’चाही प्रश्न बव्हंशी मार्गी लागणार आहे. नियमितीकरणासाठी प्रशमन शुल्क, विकास शुल्क व पायाभूत सुविधा शुल्कच्या माध्यमातून महापालिकेच्या खजिन्यात सुमारे दीडशे कोटी रुपये उत्पन्न जमा होण्याची शक्यता आहे.महाराष्टÑ शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क वसूल करून प्रशमित संरचना (कंपाऊंडिंग स्ट्रक्चर) म्हणून घोषित करत नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची नियमावली ७ आॅक्टोबर २०१० रोजी जाहीर केलेली आहे. याच शासन नियमावलीचा आधार घेत नाशिक महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासाठी जागामालक अथवा भोगवटाधारक यांच्याकडून प्रस्ताव मागविले आहेत. शासनाच्या धोरणानुसार, दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून ‘प्रशमित संरचना’ म्हणून घोषित केली जाणार असून, ती करून घेण्यासाठी नगररचना विभागाने सदरचे प्रस्ताव मागविले आहेत. सदर प्रस्ताव स्वीकारण्यासाठी महापालिकेने दि. ३१ मे २०१८ पर्यंत मुदत दिलेली आहे. सहा महिन्यांच्या आत दाखल होणाºया प्रस्तावांवर नियम-निकषांनुसार निर्णय घेतले जाणार आहेत. या धोरणामुळे शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असतानाच गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना छळणारा ‘कपाट’चाही मुद्दा यातून मार्गी लागणार आहे. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार, नऊ मीटर रस्त्यांच्या बांधकामांवरील सुमारे ३० ते ४० टक्के प्रकरणे मार्गी लागली आहेत.