शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

वैतरणाची अतिरिक्त जमीन परत करण्याची कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी ...

लोकमत न्युज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी बुधवारी (दि.२) मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित फाईल सादर करण्याचे आदेश देतानाच सदर जमिनीचे मूल्यांकन तत्काळ

करत प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन परत मिळण्याकरिता यापूर्वी बैठक झाली होती. अतिरिक्त शिल्लक राहिलेली जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत करावी, यासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा सुरू होता. मागील वर्षीच नियामक मंडळाने त्यास मान्यता दिलेली आहे. मात्र कोविडमुळे त्यास विलंब झाला. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आमदार खोसकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. जयंत पाटील यांनी त्याबाबत दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले.

इन्फो

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

चार-पाच दशकांपूर्वी झालेल्या वैतरणा धरणासाठी शासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यापैकी ६२३ हेक्टर म्हणजे सुमारे १५५० एकर अतिरिक्त जमीन ही वापरात नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना त्या परत करून सातबारावर भोगवटदार शेतकऱ्यांचे नाव लावावे, अशी अनेक वर्षांपासूनच मागणी होती. आता जलसंपदा मंत्र्यांनी याबाबत दखल घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फोटो- ०३ वैतरणा मिटिंग

वैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीबाबत आयोजित बैठकीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील. समवेत आमदार हिरामण खोसकर व अधिकारी.

===Photopath===

030621\03nsk_18_03062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०३ वैतरणा मिटिंगवैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीबाबत आयोजित बैठकीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील. समवेत आमदार हिरामण खोसकर व अधिकारी.