शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:09 IST

लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.

नाशिक : लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे. नाशिक महानगरपालिका व देवळाली कॅम्प परिसरातील एकूण ५७ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, शहरातील एकूण उपलब्ध २४ हजार ७५० जागांपैकी २२ हजार ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण केली, तर विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये २ हजार ७१७ जागा रिक्त राहिल्या. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागा हजारोंच्या संख्येत आहे.  प्रवेशासाठी इच्छुक एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली असताना अकरावीचे वर्ग आॅगस्टपासूनच सुरू झाले, तोपर्यंत केवळ पहिल्या तीन फेºयांमध्ये १५ हजार ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात बहुतेक नामांकित आणि मोठ्या महाविद्यालयांची संख्या अधिक होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. त्यानंतर दोन विशेष फेºया व प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नसल्याचे समोर आले आहे.अभ्यासक्रमाला मुक ले विद्यार्थी अकरावीच्या केंद्रीय आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे सप्टेंबर महिन्यात प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिन्यातील शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाला मुकावे लागले. शिक्षण उपसंचालकांनी यासंबंधी महाविद्यालयांनी जादा वर्ग घेण्याचे निर्देश दिले खरे, परंतु प्रत्यक्षात हे वर्ग होत आहेत की नाही यावर कोणत्याही यंत्रणेने लक्षच दिले नाही. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये उशिरा प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.