शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वंचितांच्या समस्या लेखकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण भागात गेली. त्यातूनच शोषितांचे, वंचितांचे दु:ख जवळून अनुभवलेले आहे. ज्यांनी कुणी समाजातील हे चित्र अनुभवले आहे, त्यांनी ते आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणे आवश्यक असल्याचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने ऑनलाइन गुगलमिटद्वारा विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचे व्दितीय पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बोलताना देशमुख यांनी, बालमजुरीवर मी कादंबरी लिहण्यामागेही तीच भावना असल्याचे सांगितले. बालपणाचा हक्क हिरावून घेणे यासारखे दुसरे क्रूर कृत्य नाही. तसेच स्त्री भ्रूण हत्या, पाणीटंचाई हे समाजासमोरील ज्वलंत विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य प्रवास संपत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. मायमराठीसह मला उर्दू भाषा खूप आवडते त्यावरही मी लिहित असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष देवचंद महाले पाटील यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष किरण सोनार यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार मानले.