शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या समस्या लेखकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण भागात गेली. त्यातूनच शोषितांचे, वंचितांचे दु:ख जवळून अनुभवलेले आहे. ज्यांनी कुणी समाजातील हे चित्र अनुभवले आहे, त्यांनी ते आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणे आवश्यक असल्याचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने ऑनलाइन गुगलमिटद्वारा विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचे व्दितीय पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बोलताना देशमुख यांनी, बालमजुरीवर मी कादंबरी लिहण्यामागेही तीच भावना असल्याचे सांगितले. बालपणाचा हक्क हिरावून घेणे यासारखे दुसरे क्रूर कृत्य नाही. तसेच स्त्री भ्रूण हत्या, पाणीटंचाई हे समाजासमोरील ज्वलंत विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य प्रवास संपत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. मायमराठीसह मला उर्दू भाषा खूप आवडते त्यावरही मी लिहित असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष देवचंद महाले पाटील यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष किरण सोनार यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार मानले.