शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

सार्वजनिक शौचालय-गटारींची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:21 IST

मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. ...

ठळक मुद्देकलेक्टरपट्टा परिसर : मूलभूत सोयी सुविधांपासून नागरिक वंचित

मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. कलेक्टर पट्टा भाग देखील या हद्दवाढीमध्ये समाविष्ट झाला, मात्र अजूनही या भागातील जागृतीनगर, नालंदानगर, नवीन वस्ती आदी भागात नागरी समस्यांचा अभाव आहे.कलेक्टर पट्टा भागाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. नागरी वसाहतीच्या तुलनेत या भागात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. या परिसरात निसर्गनगर, श्रीकृष्ण कॉलनी, शरदनगर, कॉलनी, केशव नगर, कलेक्टर पट्टा नववसाहत, जागृतीनगर, नालंदानगर आदी भाग समाविष्ट होतो. यातील काही भागांमध्ये रस्ते झाले मात्र अजूनही बऱ्याच भागात रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. तसेच नवीन वस्ती भागात स्वच्छतागृहांची समस्या कायम आहे. या प्रभागामध्ये काही भाग वगळता सांडपाणी गटारींची सोय नाही त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडत आहे. परिसरात रस्ते अरुंद असल्याने शोषखड्डे भरले आहेत. त्यामुळे बºयाचदा सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने त्यातून वादही होतात. जागृतीनगर, नालंदानगर येथील मोकळ्या भूखंडावरही मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य आहे. त्यामुळे या भागाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन करणाची गरज आहे. कलेक्टर पट्ट्यातील शौचालय तसेच गटारींची समस्या गंभीर असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दंगल पीडितांची वसाहत म्हणून कलेक्टरपट्टा नावारुपाला आला आहे. प्रारंभी सोयगाव ग्रामपंचायत व महापालिकेतही कलेक्टरपट्ट्याचा सहभाग नसल्याने नागरिकांना नागरी समस्यांना सामोरे जावे लागत होते. हद्दवाढीनंतर कलेक्टरपट्ट्याचा समावेश महापालिकेत झाला आहे. नगरसेवक मदन गायकवाड यांनी या भागातील कच्चे रस्ते पक्के केले आहेत. जलकुंभ उभारुन जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. रस्ते व पाण्याची समस्या सुटली असली तरी सार्वजनिक शौचालय व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या कलेक्टरपट्टा भागात काही सुविधा मिळाल्या आहेत. मात्र सार्वजनिक शौचालय, स्वच्छता, गटारींची समस्या जैसे थेच आहे.- रंजना धाबडले, रहिवासीमनपात समावेश होऊन दहा वर्षं उलटली आहेत. रस्ते व जलवाहिनीचे प्रश्न निकाली निघाले असले तरी नालंदानगर, नवीवस्ती परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. मनपाने या भागात स्वच्छता मोहीम राबवावी.- दीपा मंडाळे, रहिवासी

टॅग्स :Governmentसरकार