शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:42 IST

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अडीच हजार सदनिकांकधून शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत गेल्याने या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी पडत होता. त्यामुळे परिसरात बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यात तर परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत. काही वेळा मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. तळपत्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळेस मनपा प्रशासनास निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर सुमारे एक वर्षापूर्वी पांडवनगरी परिसरासाठी स्वतंत्र वीस लाख लिटर जलक्षमता असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. त्या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने तातडीने नवीन जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रभाग नगरसेवकांनी आयुक्त आणि महापौरांना भेटून मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता मनपा पाणीपुरवठा अधिकाºयांनी मुबलक पाणी सोडून नागरिकांना सुखद धक्का दिला. या नवीन जलकुंभातून पांडवनगरी ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान येत असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे बारा वर्षांपासूनचा कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुरळीत पुरवठा व्हावाश्रद्धाविहार कॉलनीसह परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईस जनता त्रस्त झाली होती. प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी होळी सणाच्या दिवशी पाणीपुरवठा अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. या नवीन जलकुंभामुळे पांडवनगरी परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाºया नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जलकुंभ नियमित भरला जाऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे