शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:42 IST

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अडीच हजार सदनिकांकधून शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत गेल्याने या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी पडत होता. त्यामुळे परिसरात बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यात तर परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत. काही वेळा मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. तळपत्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळेस मनपा प्रशासनास निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर सुमारे एक वर्षापूर्वी पांडवनगरी परिसरासाठी स्वतंत्र वीस लाख लिटर जलक्षमता असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. त्या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने तातडीने नवीन जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रभाग नगरसेवकांनी आयुक्त आणि महापौरांना भेटून मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता मनपा पाणीपुरवठा अधिकाºयांनी मुबलक पाणी सोडून नागरिकांना सुखद धक्का दिला. या नवीन जलकुंभातून पांडवनगरी ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान येत असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे बारा वर्षांपासूनचा कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुरळीत पुरवठा व्हावाश्रद्धाविहार कॉलनीसह परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईस जनता त्रस्त झाली होती. प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी होळी सणाच्या दिवशी पाणीपुरवठा अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. या नवीन जलकुंभामुळे पांडवनगरी परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाºया नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जलकुंभ नियमित भरला जाऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे