शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:42 IST

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अडीच हजार सदनिकांकधून शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत गेल्याने या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी पडत होता. त्यामुळे परिसरात बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यात तर परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत. काही वेळा मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. तळपत्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळेस मनपा प्रशासनास निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर सुमारे एक वर्षापूर्वी पांडवनगरी परिसरासाठी स्वतंत्र वीस लाख लिटर जलक्षमता असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. त्या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने तातडीने नवीन जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रभाग नगरसेवकांनी आयुक्त आणि महापौरांना भेटून मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता मनपा पाणीपुरवठा अधिकाºयांनी मुबलक पाणी सोडून नागरिकांना सुखद धक्का दिला. या नवीन जलकुंभातून पांडवनगरी ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान येत असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे बारा वर्षांपासूनचा कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुरळीत पुरवठा व्हावाश्रद्धाविहार कॉलनीसह परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईस जनता त्रस्त झाली होती. प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी होळी सणाच्या दिवशी पाणीपुरवठा अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. या नवीन जलकुंभामुळे पांडवनगरी परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाºया नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जलकुंभ नियमित भरला जाऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे