शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांची अडचण

By admin | Updated: August 8, 2016 22:18 IST

भऊर : शासन-व्यापाऱ्यांच्या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान

भऊर : शासनातर्फे अडत बंदचा निर्णय तर व्यापारीवर्गातर्फे कांदा विक्रीसाठी गोणीतूनच आणावा या निर्णयाच्या गोंधळामुळे गत एक महिन्यापासून बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार बंद पडून शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात कांदा उत्पादक शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडून स्थानिक बाजारपेठांमध्येही आर्थिक व्यवहार ठप्प होऊन आर्थिक मंदी आल्याचे चित्र दिसून येत आहे.कसमादे परिसरात कांदा मुख्य पीक असून, या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे. सध्या या ना त्या कारणाने कांद्याचे व्यवहार बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी एकीकडे आर्थिक भांडवलाची कमतरता, तर दुसरीकडे पावसाळा वाढून आर्द्रता वाढल्याने कांदा खराब होण्याची भीती या दुहेरी संकटात सापडला आहे. कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कांद्याचे व्यवहार पुन्हा जुन्या पद्धतीनेच सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. डाळिंबावरील तेल्या रोग, दोन-तीन वर्षांपासूनची गारपीट, बेमोसमी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे अगोदरपासूनच कंबरडे मोडलेले असताना उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती असतानाही येथील कांदा उत्पादकांनी जिवाचे रान करून, कर्ज काढून, उधारी, हातउसनवारी करून बी-बियाणे, खत, खाद्याची उपलब्धता करून उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेऊन भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन दोन पैसे पदरी पडतील या अपेक्षेत कांदा चाळीत साठवून ठेवला.पूर्वीच्या खुल्या विक्री पद्धतीसाठी लहान कुटुंबातील पती-पत्नी सकाळपासून सायंकाळपर्यंत कांद्याची निवड करून एक ट्रॉली भरत असत; परंतु सध्या गोणी भरायच्या असल्यास गोणींची किंमत, मजुरी व गोणींची आदळ-आपट, वाहतूक मध्यम कांदा उत्पादकाला अशक्य असल्यामुळे कांदा उत्पादक हतबल झाला आहे.गत हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे कसमादे परिसरातील शेतकरीवर्गाजवळ कांद्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही व हातात जगण्यासाठी पुरेसे भांडवलही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतातील उभ्या पिकांना खत, खाद्य, निंदणी, खुरपणी, फवारणीसाठी भांडवलाची गरज असून, कसमादे परिसरातील सर्वच क्षेत्रातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी वर्गाने शासन व व्यापारीवर्गात मधला पर्यायाने तडजोड करून कांद्याचे व्यवहार लवकरात लवकर सुरू करावेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)