शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

कांदा उत्पादकांची अडचण

By admin | Updated: August 8, 2016 22:18 IST

भऊर : शासन-व्यापाऱ्यांच्या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान

भऊर : शासनातर्फे अडत बंदचा निर्णय तर व्यापारीवर्गातर्फे कांदा विक्रीसाठी गोणीतूनच आणावा या निर्णयाच्या गोंधळामुळे गत एक महिन्यापासून बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार बंद पडून शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात कांदा उत्पादक शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडून स्थानिक बाजारपेठांमध्येही आर्थिक व्यवहार ठप्प होऊन आर्थिक मंदी आल्याचे चित्र दिसून येत आहे.कसमादे परिसरात कांदा मुख्य पीक असून, या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे. सध्या या ना त्या कारणाने कांद्याचे व्यवहार बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी एकीकडे आर्थिक भांडवलाची कमतरता, तर दुसरीकडे पावसाळा वाढून आर्द्रता वाढल्याने कांदा खराब होण्याची भीती या दुहेरी संकटात सापडला आहे. कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कांद्याचे व्यवहार पुन्हा जुन्या पद्धतीनेच सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. डाळिंबावरील तेल्या रोग, दोन-तीन वर्षांपासूनची गारपीट, बेमोसमी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे अगोदरपासूनच कंबरडे मोडलेले असताना उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती असतानाही येथील कांदा उत्पादकांनी जिवाचे रान करून, कर्ज काढून, उधारी, हातउसनवारी करून बी-बियाणे, खत, खाद्याची उपलब्धता करून उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेऊन भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन दोन पैसे पदरी पडतील या अपेक्षेत कांदा चाळीत साठवून ठेवला.पूर्वीच्या खुल्या विक्री पद्धतीसाठी लहान कुटुंबातील पती-पत्नी सकाळपासून सायंकाळपर्यंत कांद्याची निवड करून एक ट्रॉली भरत असत; परंतु सध्या गोणी भरायच्या असल्यास गोणींची किंमत, मजुरी व गोणींची आदळ-आपट, वाहतूक मध्यम कांदा उत्पादकाला अशक्य असल्यामुळे कांदा उत्पादक हतबल झाला आहे.गत हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे कसमादे परिसरातील शेतकरीवर्गाजवळ कांद्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही व हातात जगण्यासाठी पुरेसे भांडवलही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतातील उभ्या पिकांना खत, खाद्य, निंदणी, खुरपणी, फवारणीसाठी भांडवलाची गरज असून, कसमादे परिसरातील सर्वच क्षेत्रातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी वर्गाने शासन व व्यापारीवर्गात मधला पर्यायाने तडजोड करून कांद्याचे व्यवहार लवकरात लवकर सुरू करावेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)