शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हरिणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:09 IST

ममदापूर : येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत.

ममदापूर :येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.परंतु अचानक झालेल्या अवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत. त्याचाच फायदा ममदापूर राजापूर परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सदर साठ्यामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हरीण, लांडगे तरस मोर, ससे आदींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ममदापुर, राजापुर डोंगराळ भाग असून थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी वाहण्यास सुरु वात होऊन पाणी साठे भरण्यास मदत होते. या परिसरात हजाराच्या वरती काळवीट आणि हरणांची संख्या आहे.यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धनामध्ये छोटे छोटे नाला बांध तयार केलेआाहेत. त्यांच्यामध्ये पाणी साचल्याने गवताची पण निर्मिती होते त्यामुळे हरणांचा चाº्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागण्यास मदत होते. वनविभागाने सौरऊर्जेवर चालणारे पंप या परिसरात बसविले आहेत. त्याद्वारे पाणी काढून लहान तयार केलेल्या तळ्यांमध्ये साठवण्यात येते. यामुळे जंगल सोडून मानवी वस्तीकडे हरीने येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आह.े या वर्षीच्या भीषण दुष्काळात वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन वन्य प्राणी स्थलांतर करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु निसर्गाने अचानक अवकाळी पावसाने या परिसरातील पाणी साठे भरल्याने हे स्थलांतर सध्यातरी थांबणार आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हरीण पाहण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. हरीण पाहण्यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धन राखीव मध्ये सायकल ट्रॅक तयार केला असून सायकल वरून हरीण पाहण्याचा आनंद या परिसरात पर्यटक घेत असतात. पाणी साठे तयार झाल्याने या परिसरात आणखी जवळून हरीण पाण्याचा पर्यटकांना जुळून येणार आहे. (11येवलाममदापूर )