शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरिणांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:09 IST

ममदापूर : येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत.

ममदापूर :येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली होती.परंतु अचानक झालेल्या अवकाळी पावसाने परिसरात पिण्याच्या पाण्याचे साठे थोड्याफार प्रमाणात भरले आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये वनविभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी छोटे-मोठे वन तळे व पाणवठे तयार केले आहेत. त्याचाच फायदा ममदापूर राजापूर परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सदर साठ्यामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हरीण, लांडगे तरस मोर, ससे आदींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ममदापुर, राजापुर डोंगराळ भाग असून थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी वाहण्यास सुरु वात होऊन पाणी साठे भरण्यास मदत होते. या परिसरात हजाराच्या वरती काळवीट आणि हरणांची संख्या आहे.यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धनामध्ये छोटे छोटे नाला बांध तयार केलेआाहेत. त्यांच्यामध्ये पाणी साचल्याने गवताची पण निर्मिती होते त्यामुळे हरणांचा चाº्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागण्यास मदत होते. वनविभागाने सौरऊर्जेवर चालणारे पंप या परिसरात बसविले आहेत. त्याद्वारे पाणी काढून लहान तयार केलेल्या तळ्यांमध्ये साठवण्यात येते. यामुळे जंगल सोडून मानवी वस्तीकडे हरीने येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आह.े या वर्षीच्या भीषण दुष्काळात वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन वन्य प्राणी स्थलांतर करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु निसर्गाने अचानक अवकाळी पावसाने या परिसरातील पाणी साठे भरल्याने हे स्थलांतर सध्यातरी थांबणार आहे. ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हरीण पाहण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. हरीण पाहण्यासाठी वनविभागाने ममदापूर संवर्धन राखीव मध्ये सायकल ट्रॅक तयार केला असून सायकल वरून हरीण पाहण्याचा आनंद या परिसरात पर्यटक घेत असतात. पाणी साठे तयार झाल्याने या परिसरात आणखी जवळून हरीण पाण्याचा पर्यटकांना जुळून येणार आहे. (11येवलाममदापूर )