शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कळवण, देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:14 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात ...

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात आले. कळवण तालुक्यातील भेंडी आणि मानूर गावासाठी पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. कालव्याला पाणी सोडल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या निमित्ताने सुटण्यास मदत होणार आहे.

आमदार नितीन पवार यांनी चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडून कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली होती. उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आमदार पवार यांच्या मागणीनुसार जिल्ह्याधिकारी मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर १२ मे २०२१ रोजी पाटबंधारे विभागाने अहवाल सादर करून २०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात नमूद केल्याने १७ मे २०२१ रोजी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले.

---------------------------

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चणकापूर धरणातून लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यासाठी व रामेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्पापर्यंत २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोरे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. कालव्यातून पाणी चोरी होणार नाही यासाठी कोल्हापूर फाटा आणि देवळा येथील कालवा उपविभागाची यंत्रणा लक्ष ठेवून राहणार असून, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कालव्यावर तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. उजव्या कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

---------------

या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार

चणकापूर, दत्तनगर, भगुर्डी, अभोणा, वंजारी, दह्याणे, पाळे, विठेवाडी, सावकी, कळमथे, पाळे , मानूर, साकोरे, जिरवाडे, भुसणी, कळवण खुर्द, मानूर, कळवण, नवीबेज, भेंडी, निवाने, वरवंडी, भऊर, विठेवाडी, वरवंडी रामेश्वर, मटाणे, माळवाडी, वाजगाव, सुभाषनगर, पिंपळगाव, वाखारी, गुंजाळनगर, झिरेपिंपळ, फुले माळवाडी, खालप, मकरंदवाडी आदी कळवण व देवळा तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार आहे.