शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

कळवण, देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:14 IST

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात ...

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात आले. कळवण तालुक्यातील भेंडी आणि मानूर गावासाठी पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. कालव्याला पाणी सोडल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या निमित्ताने सुटण्यास मदत होणार आहे.

आमदार नितीन पवार यांनी चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडून कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली होती. उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आमदार पवार यांच्या मागणीनुसार जिल्ह्याधिकारी मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर १२ मे २०२१ रोजी पाटबंधारे विभागाने अहवाल सादर करून २०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात नमूद केल्याने १७ मे २०२१ रोजी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले.

---------------------------

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चणकापूर धरणातून लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यासाठी व रामेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्पापर्यंत २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोरे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. कालव्यातून पाणी चोरी होणार नाही यासाठी कोल्हापूर फाटा आणि देवळा येथील कालवा उपविभागाची यंत्रणा लक्ष ठेवून राहणार असून, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कालव्यावर तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. उजव्या कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

---------------

या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार

चणकापूर, दत्तनगर, भगुर्डी, अभोणा, वंजारी, दह्याणे, पाळे, विठेवाडी, सावकी, कळमथे, पाळे , मानूर, साकोरे, जिरवाडे, भुसणी, कळवण खुर्द, मानूर, कळवण, नवीबेज, भेंडी, निवाने, वरवंडी, भऊर, विठेवाडी, वरवंडी रामेश्वर, मटाणे, माळवाडी, वाजगाव, सुभाषनगर, पिंपळगाव, वाखारी, गुंजाळनगर, झिरेपिंपळ, फुले माळवाडी, खालप, मकरंदवाडी आदी कळवण व देवळा तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार आहे.