शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

येवल्यात ६ ओबीसी नगरसेवकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून ...

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या शफिक शेख, तेहसीन शेख, साबीया मोमीन, अमजद शेख, नीता परदेशी, प्रवीण बनकर या सदस्यांना आता डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेचा पर्याय शोधावा लागणार आहे.

-----------------------------------------------------------

त्र्यंबकेश्वरीत पाच नगरसेवकांना धक्का

त्र्यंबक : येथील नगर परिषदेत ओबीसीसाठी २७ टक्क्यांच्या प्रमाणात पाच जागा आरक्षित होत्या. या जागांवर गेल्या निवडणुकीत स्वप्निल शेलार, शितल उगले, त्रिवेणी तुंगार, दीपक गिते आणि शिल्पा रामायणे हे उमेदवार निवडून आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय दिल्याने या नगरसेवकांसह इच्छुकांना अन्य सर्वसाधारण जागांचा पर्याय शोधावा लागणार आहे. दरम्यान, ओबीसी राखीव जागेवर निवडून आलेले नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी सांगितले, ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय हा अन्यायकारक आहे. याबाबत राज्य सरकारने मुदतीत फेरयाचिका दाखल करण्याची गरज आहे. सरकार काही हालचाल करत नसेल तर आम्ही जनहित याचिका दाखल करू, अन्यथा आंदोलनाचा पर्याय असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------

मनमाडला ८ जागांवरील आरक्षण रद्द

मनमाड : येथील नगरपालिकेच्या नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी ३१ वाॅर्डमधून १५ प्रभाग तयार करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण ८ जागांचे आरक्षण ठेवण्यात आले होते. यातील चार जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याने त्याचे परिणाम येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येणार आहेत.

मनमाड पालिकेमध्ये कविता कोटकर, तबस्सुम कुरेशी, यास्मिन शेख, किरण शिंदे या चार महिला नगरसेवक ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आल्या आहेत, तर गणेश धात्रक, कैलास पाटील, महेंद्र शिरसाठ, प्रवीण नाईक हे नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत. या सर्व मातब्बर नगरसेवकांना येत्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा विशिष्ट घटकांवर अन्याय करणारा आहे. याबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचे शिवसेना नगरसेवक गणेश धात्रक यांनी सांगितले.