शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

येवल्यात ६ ओबीसी नगरसेवकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून ...

डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येवला नगरपालिकेच्या १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून आलेले आहेत. यात ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या शफिक शेख, तेहसीन शेख, साबीया मोमीन, अमजद शेख, नीता परदेशी, प्रवीण बनकर या सदस्यांना आता डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेचा पर्याय शोधावा लागणार आहे.

-----------------------------------------------------------

त्र्यंबकेश्वरीत पाच नगरसेवकांना धक्का

त्र्यंबक : येथील नगर परिषदेत ओबीसीसाठी २७ टक्क्यांच्या प्रमाणात पाच जागा आरक्षित होत्या. या जागांवर गेल्या निवडणुकीत स्वप्निल शेलार, शितल उगले, त्रिवेणी तुंगार, दीपक गिते आणि शिल्पा रामायणे हे उमेदवार निवडून आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय दिल्याने या नगरसेवकांसह इच्छुकांना अन्य सर्वसाधारण जागांचा पर्याय शोधावा लागणार आहे. दरम्यान, ओबीसी राखीव जागेवर निवडून आलेले नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी सांगितले, ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय हा अन्यायकारक आहे. याबाबत राज्य सरकारने मुदतीत फेरयाचिका दाखल करण्याची गरज आहे. सरकार काही हालचाल करत नसेल तर आम्ही जनहित याचिका दाखल करू, अन्यथा आंदोलनाचा पर्याय असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------

मनमाडला ८ जागांवरील आरक्षण रद्द

मनमाड : येथील नगरपालिकेच्या नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी ३१ वाॅर्डमधून १५ प्रभाग तयार करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण ८ जागांचे आरक्षण ठेवण्यात आले होते. यातील चार जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याने त्याचे परिणाम येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येणार आहेत.

मनमाड पालिकेमध्ये कविता कोटकर, तबस्सुम कुरेशी, यास्मिन शेख, किरण शिंदे या चार महिला नगरसेवक ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आल्या आहेत, तर गणेश धात्रक, कैलास पाटील, महेंद्र शिरसाठ, प्रवीण नाईक हे नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत. या सर्व मातब्बर नगरसेवकांना येत्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा विशिष्ट घटकांवर अन्याय करणारा आहे. याबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचे शिवसेना नगरसेवक गणेश धात्रक यांनी सांगितले.