शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

खतप्रकल्पाचे खासगीकरण, स्थायीवर लवकरच प्रस्ताव

By admin | Updated: August 2, 2016 02:28 IST

आयुक्त : चार महिन्यांत प्रश्न लागणार मार्गी

 नाशिक : महापालिकेला खतप्रकल्प चालविणे मुश्कील बनल्याने माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याच काळात खतप्रकल्पाच्या खासगीकरणाची प्रक्रिया राबविली गेली असली तरी त्यासंबंधी नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त होऊ शकलेला नाही. सदर अहवाल चालू आठवड्यात प्राप्त होण्याची प्रतीक्षा असून, त्यानंतर सदरचा प्रस्ताव स्थायीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी खतप्रकल्पाचा प्रश्न येत्या चार महिन्यांत मार्गी लागेल, अशी ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली.माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कारकीर्दीत आउटसोर्सिंगद्वारे खतप्रकल्प चालविण्यास देण्याच्या घडामोडी घडल्या. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पुणे येथील मेलहॅम आणि फ्रान्समधील आयकॉस या संस्थांनी संयुक्तपणे सादर केलेली निविदा न्यूनतम दराची प्राप्त झाली होती. या संस्थांनी ७०० रुपये प्रतिटन दर सांगितला होता. सदर दर आणखी कमी व्हावा यासाठी तडजोडीही करण्यात आल्या. दरम्यान, ३० वर्षांसाठी ठेका देण्यात येणार असल्याने दोन्ही संस्थांचा प्रस्ताव पडताळून पाहण्यासाठी सरकारशी संबंधित मून इन्फ्रा नामक कंपनी आणि पुण्याच्या गोखले एज्युकेशन यांच्याकडून अहवाल मागविण्यात आले होते. परंतु मून इन्फ्रा कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर गोखले एज्युकेशन या संस्थेने अहवालासाठी आणखी दोन-अडीच महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे महापालिकेने आता या अहवालांवर अवलंबून न राहता खतप्रकल्पाच्या प्रस्तावाला पुढे चाल देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, दर कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीचा अहवाल येत्या आठवड्यात प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सदरचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला जाईल. संबंधित कंपनीला कार्यादेश दिल्यानंतर खतप्रकल्प सुरू करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे, परंतु कंपनीने चार महिन्यांच्या कालावधीतच तो सुरू करावा, यासाठी प्रयत्न राहणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय हा खतप्रकल्पाशी संबंधित असल्याने खतप्रकल्पाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)