शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

तिसऱ्या श्रावणी फेरीला यंदाही खासगी वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:22 IST

नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावणमासात दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यंदाही राज्य परिवहन महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर फक्त एस. टी. बसनेच भाविकांची वाहतूक करण्याचे ठरविले असून, विशेष करून तिसºया सोमवारी होणाºया ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दिवशी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांना बंदी करण्याचे साकडे एस.टी. महामंडळाने जिल्हाधिकाºयांना घातले आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : जव्हारफाटा, खंबाळे फाट्यावर वाहनतळ, वाहतूक कोंडीवर उपाय

नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावणमासात दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यंदाही राज्य परिवहन महामंडळाने नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर फक्त एस. टी. बसनेच भाविकांची वाहतूक करण्याचे ठरविले असून, विशेष करून तिसºया सोमवारी होणाºया ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दिवशी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांना बंदी करण्याचे साकडे एस.टी. महामंडळाने जिल्हाधिकाºयांना घातले आहे.बारा ज्योतिलर््िंागापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी श्रावण मासात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. बाहेरगावचे प्रवासी बहुतांशी खासगी वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे येत असले तरी, परराज्यांतील भाविकांसाठी एस. टी. रेल्वेचा मार्ग सुकर असल्याने त्यांना नाशिकमार्गेच त्र्यंबक गाठावे लागते. विशेष करून सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला एकाच दिवशी लाखो भाविकांची हजेरी लागत असल्याने अशा वेळी प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्याचे मोठे आव्हान एस.टी. महामंडळासमोर उभे ठाकते.अशा वेळी वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने दि. २६ व २७ या दोन दिवसांसाठी खंबाळे फाटा ते त्र्यंबकेश्वर यादरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे.त्र्यंबकेश्वरला खासगी वाहनांनी येणाºया भाविकांची वाहने खंबाळे फाटा, जव्हारफाटा येथेच उभी करण्यात यावेत व त्र्यंबक बसस्थानकाच्या चारही बाजूस दोनशे मीटरपर्यंत नो पार्किंग झोन जाहीर करण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना केली आहे. यंदाही एस. टी. महामंडळाने श्राावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची वाहतूक करण्यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असून, त्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. येत्या रविवारपासून श्रावण मासाला सुरुवात होत असून, दुसºयाच दिवशी श्रावणाचा पहिलाच सोमवार आहे. या काळात भाविकांची वाहतूक केली जाईल, परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिसºया श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी डोंगराला प्रदक्षिणा मारण्याची भाविकांची श्रद्धा आहे. यादिवशी सुमारे दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे आदल्या दिवशीच दाखल होत असल्यामुळे प्रदर्शना पूर्ण झाल्यानंतर नाशिकला परतीसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.