शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी एजन्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:48 IST

नाशिक : महसूल खात्याच्या कामकाजात अपेक्षित काय आणि प्रत्यक्षात होते काय ते पाहता, सामान्यांचे सेवक असल्याची भावनाच नष्ट झाल्याचे दिसत असून, भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारी व त्यातून होणारी कारवाई पाहता हे चित्र बदलण्यासाठी आता महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र खासगी एजन्सी नेमून या एजन्सीच्या माध्यमातून थेट पोलीस खात्यालाच ब्रिफिंग करण्याचे काम सोपविण्यात आल्याने महसूल खात्याने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्देलॅपटॉप खरेदीचे अधिकार स्थानिक पातळीवरचंद्रकांत पाटील : अधिकाऱ्यांच्या बैठकीत कामकाज सुधारण्याचा सल्ला

नाशिक : महसूल खात्याच्या कामकाजात अपेक्षित काय आणि प्रत्यक्षात होते काय ते पाहता, सामान्यांचे सेवक असल्याची भावनाच नष्ट झाल्याचे दिसत असून, भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारी व त्यातून होणारी कारवाई पाहता हे चित्र बदलण्यासाठी आता महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र खासगी एजन्सी नेमून या एजन्सीच्या माध्यमातून थेट पोलीस खात्यालाच ब्रिफिंग करण्याचे काम सोपविण्यात आल्याने महसूल खात्याने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल खात्याच्या जिल्हास्तरीय कामकाजाच्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. वाळूत भ्रष्टाचार, मुद्रांक शुल्क खात्याच्या कारभारात एजंटांच्या माध्यमातून कमिशन खाण्याचे प्रकार पाहता, वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस पारदर्शी कामकाजाचा आग्रह धरत असताना, कोल्हापूर जिल्ह्णात एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे सहा ठिकाणी छापे पडल्याने अनेक कार्यालये बंद करण्याची वेळ आल्याचे सांगून पाटील यांनी गेल्या वर्षात राज्यात अनेक तलाठी व तहसीलदार ट्रॅपमध्ये सापडले आहेत. महसूल खात्याच्या अधिकाºयांच्या कामकाजातील संवेदनाच नष्ट झाली असून, सीमेवर तैनात असलेला लष्कराचा जवान वर्षातून कुटुंबाला भेटण्यासाठी येतो त्याचवेळी तो आपले शासकीय कामकाज करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. त्यालादेखील वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते ही बाब असंवेदनशीलता दर्शविणारी आहे. ब्रिटिशांनी महसूलची निर्मिती निव्वळ कर वसुलीसाठी केली होती; परंतु आजही तीच मानसिकता अधिकारी, कर्मचाºयांमध्ये दिसत असल्याने खासगी एजन्सीच्या माध्यमातून कामकाजावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. ही एजन्सी स्वतंत्रपणे काम करेल. ज्या अधिकारी, कर्मचाºयांकडून जनतेची कामे होणार नाहीत, त्यांना त्रास देण्याचा उद्योग होत असेल तर परस्पर पोलिसांना ब्रिफिंग केले जाईल व त्या माध्यमातून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.खात्यांतर्गत केल्या जाणाºया विभागीय चौकशीच्या फाईली दहा-दहा वर्षे प्रलंबित ठेवण्याची पद्धत चुकीची असून, यापुढे तीन महिन्यांच्या आत विभागीय चौकशी पूर्ण केली जावी, अशी सूचनाही पाटील यांनी केली. महसूल अधिकाºयांना जनतेची कामे करताना ज्या काही कायदेशीर अडचणी येतात त्यावर राज्यपातळीवर निबंध स्पर्धा घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला.लॅपटॉप खरेदीचे अधिकार स्थानिक पातळीवरराज्य सरकारने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून लॅपटॉप खरेदी केली असली तरी त्याविषयी झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता चालू वर्षी लॅपटॉप खरेदीसाठी जिल्हा पातळीवरच निविदा काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. जिल्ह्णातील अनेक तलाठी, मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप मिळालेले नसल्याने राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून त्यासाठी तरतूद करण्यात यावी अशा सूचना आपण देणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.