शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

भडकले भाज्यांचे भाव

By admin | Updated: June 1, 2017 02:00 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरु वारपासून (दि. १) शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीकडून सुरू असून, जिल्हाभरातून सुमारे तेराशेहून अधिक गावांतील शेतकरी या संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने शहरातील नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली असून, आठवडे बाजारासह शहरातील विविध ठिकाणच्या भाजी बाजारात किमान आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करणाऱ्या गृहिणींची संख्या जास्त होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी संपाची माहिती पोहोचविण्याबरोबरच माहितीपत्रके आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून संपाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यात येत आहे. शेतात पिकणारा माल शहर परिसरात विक्र ीला जाऊ द्यायचा नाही, याची दक्षता प्रत्येक गावाने गावपातळीवरच घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या संपात गावागावांतून सहभागी झालेले शेतकरी अपवादात्मकरीत्या बाजारात येऊ पाहणाऱ्या गाड्यांनाही अडवणार आहे. त्यामुळे शहराचा भाजीपाल्याच्या पुरवठा खंडित होणार आहे. या संपाचा विचार सर्वसामान्य नाशिककरांना सतावत असताना भाजीविक्रे त्यांनी मात्र भाज्यांचे भाव वाढवून विक्री सुरू केल्याचे प्रकारही समोर आले असून, शहरात खुल्या विक्रीसाठी आलेले दूधही हातोहात संपल्याचे दिसून आले. सर्वसामान्य ग्राहकांनी जरी दुधाचा साठा केला नसला तरी छोटे चहा टपरीवाले व्यावसायिकांनी किमान दोन दिवस पुरेल इतके दूध घेतल्याचे दिसून आले. शेतकरी संपात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतच अनेक दूध डेअरींनीही सहभाग नोंदविल्यामुळे गुरुवारपासून शहरी भागात पिशवीबंद दुधाचाही तुटवडा निर्माण होणार आहे. तर दोन दिवसांनी असे पिशवीबंद दूधही मिळणार नाही. त्यामुळे चहाचे टपलीवाले व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.गुरुवारी शेतकरी संपावर जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बुधवारीच बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला. तर भाजीपाला तुटवड्याच्या भितीने व्यापाऱ्यांनीदेखील खरेदीसाठी गर्दी केली.