शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

डाळींच्या किमती कडाडल्या

By admin | Updated: May 30, 2016 23:35 IST

महागाईचा फटका : तूर, उडीद, मूग डाळींनी केली शंभरी पार

 नाशिक : देशासह राज्यातील विविध भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून, तूर, मूग, उडीद आदि डाळींच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. राज्यातील अत्यल्प पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वच डाळींच्या किमती प्रतिकिलो दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. देशांतर्गत उत्पादनात झालेली घट व विदेशातून आयात डाळींना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे देशात उत्पादित डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ १३५ ते १४० रु पये किलोने मिळत आहे. उडीद १७०, हरभरा ८० ते ८५ , मूग १०० रु पये प्रतिकिलो असे सध्याचे दर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या बाजारभावात जवळपास दुप्पट दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात हरभराडाळीचे भाव प्रतिकिलो ६०, उडीद ७८, मूगडाळ ७५ रुपये होते. सर्व डाळींच्या दरांमध्ये प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी दरवाढ झाली असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीमुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळींसोबतच बाजरी, तांदूळ, साखर, शेंगदाणे, खाद्यतेल, कांदा आदि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली असून, साखरीच्या किमतीतही १० रुपये वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)