शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डाळींच्या किमती कडाडल्या

By admin | Updated: May 30, 2016 23:35 IST

महागाईचा फटका : तूर, उडीद, मूग डाळींनी केली शंभरी पार

 नाशिक : देशासह राज्यातील विविध भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून, तूर, मूग, उडीद आदि डाळींच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. राज्यातील अत्यल्प पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वच डाळींच्या किमती प्रतिकिलो दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. देशांतर्गत उत्पादनात झालेली घट व विदेशातून आयात डाळींना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे देशात उत्पादित डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ १३५ ते १४० रु पये किलोने मिळत आहे. उडीद १७०, हरभरा ८० ते ८५ , मूग १०० रु पये प्रतिकिलो असे सध्याचे दर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या बाजारभावात जवळपास दुप्पट दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात हरभराडाळीचे भाव प्रतिकिलो ६०, उडीद ७८, मूगडाळ ७५ रुपये होते. सर्व डाळींच्या दरांमध्ये प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी दरवाढ झाली असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीमुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळींसोबतच बाजरी, तांदूळ, साखर, शेंगदाणे, खाद्यतेल, कांदा आदि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली असून, साखरीच्या किमतीतही १० रुपये वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)