शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

इतर वस्तुंचे दर वाढले मात्र भाजीपाला कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

मात्र एकाही राजकीय पक्षाने किंवा शेतकरी संघटनेने त्या विरोधात आंदोलन केले नसल्याची खंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात ...

मात्र एकाही राजकीय पक्षाने किंवा शेतकरी संघटनेने त्या विरोधात आंदोलन केले नसल्याची खंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन पिकविलेला माल किती दिवस कवडीमोल दराने विकायचा याचा विचार शेतकऱ्यांनी करावा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

मागील लोकडाऊन नंतर शेती सोडून सर्वच मालाचे भाव २५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. आज दुचाकीच्या किमती २० ते ५० हजारांनी तर चारचाकी १ ते ३ लाखानी वाढल्या आहेत. कोरोनाच्या आधी ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट लोखंड शेती औजारे खते बियाणे कीटकनाशके व डिझेल पेट्रोलच्या बाबतीत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात देशाला सावरणाऱ्या बळी राजाला आज दुय्यम वागणूक दिली जाते आहे. नाशिकमधील शेती ही गेल्या २ दशकात खर्चिक झाली आहे. त्यामुळे शेतीवर आधारित बाजारपेठेत दरवर्षी करोडोची उलाढाल होत आहे पण शेतकरी दिवसोदिवस खड्यात जाताना दिसत आहेत.

त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे हे औषध मारा हे ब्लोअर घ्या ती व्हरायटी लावा ती ड्रीप वापरा ह्या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होतोय याच्या एक टक्का ही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे. जर या बाबतीत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही. भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो त्यामुळे उत्पादन खर्च खूप जास्त आहे त्याप्रमाणे जर बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर एवढे महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने विकायचा याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत खृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.