शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

डाळ व्यापाऱ्यांची झडती सुरूच

By admin | Updated: October 21, 2015 23:25 IST

७० ठिकाणी तपासणी : प्रशासनाचे हात रिकामे

नाशिक : तूरडाळ साठवणुकीच्या संशयावरून जिल्ह्यातील ७० व्यापाऱ्यांच्या दुकानांची व गुदामांची दुसऱ्या दिवशीही तपासणी करण्यात आली. परंतु शासनाने घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना अन्नधान्य, डाळींच्या साठवणुकीच्या क्षमतेच्या दिलेल्या वाढीव परवान्यांमुळे प्रशासनाच्या हाती काहीही लागलेले नाही. खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत भिडल्याने व्यापाऱ्यांनीच डाळींची साठवणूक करून कृत्रिम टंचाई केल्याचा शासनाला संशय असल्यामुळे मंगळवारपासून धान्य व्यापाऱ्यांची दुकाने व गुदामे तपासून क्षमतेपेक्षा जास्त डाळ साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील धान्य व डाळी विक्रेत्यांचे परवाने व गुदामातील शिल्लक मालाची तपासणी केली जात असून, ज्या ज्या ठिकाणी डाळ मिल आहे, त्यांचीही क्षमता तपासून वाढीव साठा आहे किंवा काय याची खात्री करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही डाळ मिलचालकांची चौकशी केली असता, त्यांना शासनाने परवाना दिलेल्या प्रमाणापेक्षा अत्यल्प डाळ शिल्लक असल्याची आढळून आली आहे. जिल्ह्यात राजस्थान, मराठवाड्याकडून डाळींची आयात होते हे या तपासणीत स्पष्ट झाले; परंतु यंदा डाळींचे उत्पादन घटल्यामुळे पाहिजे तितकी डाळ घेता आली नाही, अशी खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली. शहरातील काही विक्रेत्यांचे पेठरोडवरील कृउबा आवारात गुदामे असल्यामुळे या ठिकाणी डाळींचा साठा असण्याची शक्यता लक्षात घेता धान्य वितरण अधिकारी सुनील सैंदाणे, नायब तहसीलदार बिरारी यांनी कृउबातील चार व्यापाऱ्यांच्या गुदामांची तपासणी केली, त्याचबरोबर नाशिकरोड येथेही काही व्यापारी असल्याचे कळाल्यावर त्यांचाही शिल्लक साठा तपासला; परंतु त्यात काहीच आढळून आले नाही. (प्रतिनिधी)