शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
3
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
4
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
5
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
6
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
7
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
8
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
9
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
10
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
11
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
12
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
13
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
14
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
15
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
16
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
17
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
18
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
19
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
20
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST

चौकट- गुळाचा चहा बनले स्टेटस पूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे. अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत ...

चौकट-

गुळाचा चहा बनले स्टेटस

पूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे. अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत होता. त्यात पौष्टिकता अधिक होती. लग्नसमारंभ, साखरपुडा, दशक्रिया विधी आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक गरीब लोक गुळाच्या लापशीलाच अधिक प्राधान्य देत असत. इतकेच नव्हे ते अनेक जुन्या पहिलवानांचे गूळ आणि शेंगदाणे हे प्रमुख खाद्य होते. इतकेच काय सकाळी सकाळी कामाला निघणारे कामगारही खिशात गूळ आणि शेंगदाणे घेऊन घराबाहेर पडत असत. कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तेवढे शेंगदाणे आणि गूळ संपवित असत. गुळाचा चहा दररोज व्हायचा. सणावाराला गुळाचे गुळवणी मंडळी पुरणपोळी कुस्करुन खात असत. साखर आल्यानंतर मात्र ती मजा गेली. गुळाची जागा साखरेने घेतली अन्‌ गुळाच्या लापशीची जागा साखर शिऱ्याने घेतली. आता पुन्हा दिवस पालटले आहेत. अनेक नागरिक आरोग्याबाबत विशेष जागरुक झाले असून गुळाच्या चहालाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी तर गुळाच्या चहाची हॉटेल्स सुरु झाली आहेत.

कोट-

प्रकृतीसाठी गूळ चांगला

साखर तयार करताना खूप प्रक्रिया केल्या जातात. त्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया होत असल्याने गुळात मिनरल्स, खनिज लोह हे पदार्थ टिकून राहतात. गुळातून आपल्याला काही प्रमाणात आयर्नही मिळत असते त्यामुळे आरोग्यासाठी गूळ चांगला आहे. भारतीय संस्कृतीतही गुळाला महत्त्व आहे. पूर्वी कुणीही घरी आले तर त्यांना प्रथम गुळाचा खडा आणि पाणी देत असत ही आपली परंपरा आहे. - मीनल बाकरे- शिंपी, आहारतज्ज्ञ

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी

कोट-

अनेक लोक आता गुळाच्या चहाकडे वळाले आहेत. ऑरगॅनिक टी, ग्रीन टी यांनाही पसंती मिळू लागली आहे. सध्या लाेणचे बनविण्यासाठीही गुळाचा वापर होत असल्याने गुळाला चांगली मागणी वाढली आहे. कोरोनाच्या काळात तर नागरिकांना गुळाचे विशेष महत्त्व पटले असल्याचे दिसून येते. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी

गावात मात्र साखरच !

कोट-

गुळापेक्षा साखर स्वस्त असल्याने ग्रामीण भागात गुळापेक्षा साखरेलाच अधिक पसंती दिली जाते. सध्या तर गूळ आणि साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांचा फरक आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना ते परवडण्यासारखे असल्याने या भागात साखरेची अधिक विक्री होत असते. - विजय श्रीमाळी, किराणा व्यापारी