शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

खरीपापूर्वीच रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला ...

गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला आहे. त्यात कोरोनामुळे पिकलेल्या मालाला भाव नसल्याने नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट तसेच अवकाळी वातावरण अशा अनेक आर्थिक नुकसानीत शेतकरी जगत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यंदा खरीप हंगामात रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही स्पष्ट चित्र नव्हते. मात्र, अचानक दोन दिवसांत सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ करण्याचा निर्णय झाल्याने विशेषतः शेतकऱ्यांमध्ये तसेच केंद्रसंचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रतिबॅग १०० पासून ते ७०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरात खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

कोट...

रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे शेतकरीवर्ग व कृषी सेवा केंद्र खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. तसेच आम्ही सर्व कृषी सेवा केंद्र संचालक संभ्रमात आहोत. तरी केंद्र सरकारने यावर निर्णय घेऊन लवकर शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.

सोमनाथ अहिरे, संचालक, गंगापुत्र कृषिसेवा केंद्र, वडेल,

कोट...

शेतकरी आधीच कोरोना, अवकाळी पाऊस, मालाला भाव तसेच त्यात मार्केट बंदमुळे पैसे उपलब्ध नाहीत. आगामी खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची भाववाढ यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

- विशाल व्ह्याळीज, शेतकरी, कुकाणे

I