शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खरीपापूर्वीच रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला ...

गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला आहे. त्यात कोरोनामुळे पिकलेल्या मालाला भाव नसल्याने नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट तसेच अवकाळी वातावरण अशा अनेक आर्थिक नुकसानीत शेतकरी जगत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यंदा खरीप हंगामात रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही स्पष्ट चित्र नव्हते. मात्र, अचानक दोन दिवसांत सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ करण्याचा निर्णय झाल्याने विशेषतः शेतकऱ्यांमध्ये तसेच केंद्रसंचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रतिबॅग १०० पासून ते ७०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरात खते देण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

कोट...

रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे शेतकरीवर्ग व कृषी सेवा केंद्र खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. तसेच आम्ही सर्व कृषी सेवा केंद्र संचालक संभ्रमात आहोत. तरी केंद्र सरकारने यावर निर्णय घेऊन लवकर शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.

सोमनाथ अहिरे, संचालक, गंगापुत्र कृषिसेवा केंद्र, वडेल,

कोट...

शेतकरी आधीच कोरोना, अवकाळी पाऊस, मालाला भाव तसेच त्यात मार्केट बंदमुळे पैसे उपलब्ध नाहीत. आगामी खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची भाववाढ यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

- विशाल व्ह्याळीज, शेतकरी, कुकाणे

I