शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

माघारीसाठी दबाव अन् मनधरणीही

By admin | Updated: February 7, 2017 22:51 IST

अखेरचा दिवस गाजला : अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला केले पाचारण

नाशिक : प्रतिस्पर्ध्यांवर असलेले लक्ष, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा व टळत जाणारी वेळ असे चित्र मंगळवारी नाशिक शहरातील सहाही विभागीय कार्यालयांबाहेर पाहण्यात आले. काहींनी थेट मनधरणी करीत अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला मानसन्मानाने माघारीसाठी पाचरण केले, तर काहींनी धाकदपडशा दाखवून माघार घेण्यास भाग पाडले. निवडणुकीत संधी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांनी तर पडद्याआड आर्थिक तडजोड करून घेतल्याच्याही खमंग चर्चाही चर्चिल्या गेल्या.महापालिका निवडणुकीची नुसती चर्चा सुरू झाल्यापासूनच इच्छुकांना घुमारे फुटून आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या प्रभागाची शोधाशोध तर केलीच, परंतु प्रत्यक्ष प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर पॅनलमध्ये कोण असावे आणि कोण नसावे याचाही अंदाज बांधला. राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी उंबरठे झिजविण्याबरोबरच पक्षांतराचा पर्यायही खुला ठेवला. अशा प्रकारचा सर्व खटाटोप करून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांसाठी आता प्रतिस्पर्र्धीदेखील नकोसे वाटू लागल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून माघारीसाठी प्रयत्न केले जात होते, त्याची झलक मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून सर्वत्र दिसली. महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्यांबरोबरच अपक्ष व आघाडी करून रिंगणात उभे असलेल्यांमुळे एकेका गटात सहा ते सात उमेदवार रिंगणात शिल्लक असल्यामुळे विजयाचे गणित बिघडण्याची भीती अनेकांना वाटू लागली, त्यामुळे शक्यतो अपक्ष व आघाडी केलेल्यांना माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.प्रतिस्पर्ध्याला फोडला घामकाहींवर सामाजिक, जातीय दबाव टाकण्यात आला, तर काहींना शेवटची संधी आहे, पुढची संधी तुम्हाला, असे आश्वासन देऊन मनधरणी करण्यात आली. काही चाणाक्ष उमेदवार या साऱ्या प्रकारांपासून परिचित असल्याने भूमिगत झाले असता, त्यांच्या शोधासाठी वणवण करावी लागली. कसेबसे हाती लागलेल्यांना मानसन्मान देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत आणण्यात आले. काही बाहुबलींनी तर थेट ‘पाहून घेऊ’ अशी दमबाजी करून प्रतिस्पर्ध्याला घाम फोडला. माघार घेण्यासाठी दुपारी तीन वाजेची अंतिम मुदत असल्यामुळे दुपारी बारा वाजेपासूनच प्रमुख उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून कोण माघार घेतो याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारीही लक्ष ठेवून होते. माघारीच्या दिवशी हाणामारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.