शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

अध्यक्ष म्हणतात, बिघडले काय?

By admin | Updated: October 11, 2015 21:38 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : घटनेतील दहा वर्षे मुदतीचे कलम वगळण्यासाठी आटापिटा

नाशिक : गेल्या पंचवीस वर्षांत कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग प्रतिष्ठानचे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले कोठे, असा सवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. अध्यक्षांच्या याच पवित्र्यामुळे ठराविक विश्वस्तांना प्रतिष्ठानमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रतिष्ठानच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष व विश्वस्तांनी सध्या प्रतिष्ठानच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा घाट घातला असून, या पार्श्वभूमीवर कर्णिक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी या प्रक्रियेचे समर्थनच केले. प्रतिष्ठानची घटना स्वत: कुसुमाग्रजांनी तयार करवून घेतली असून, या घटनेच्या आठव्या कलमात प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पाच वर्षे असा निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देता येते; मात्र एका व्यक्तीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिला विश्वस्तपदावर राहता येत नाही. प्रतिष्ठानवर ठराविक व्यक्तींनी वर्षानुवर्षे ठाण मांडून राहू नये, नव्या व्यक्तींनाही कामाची संधी मिळावी, असा दूरगामी विचार करून तात्यासाहेबांनी घटनेत या कलमाचा अंतर्भाव केला होता; मात्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी या कलमात दुरुस्तीचा निर्णय घेत कुसुमाग्रजांच्या मूळ हेतूलाच नख लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कलमातील दहा वर्षे मुदतीची अट वगळण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार धर्मादाय आयुक्तांकडे दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रतिष्ठानच्या घटनेत ‘कोणत्याही विश्वस्ताची मुदत एकूण दहा वर्षांपेक्षा अधिक असणार नाही’, असा स्पष्ट उल्लेख कुसुमाग्रजांनी केला आहे. त्यामागे त्यांचा ठोस विचार होता; मात्र या प्रक्रियेद्वारे त्या विचारालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दुरुस्तीमुळे ठराविक व्यक्तींना वर्षानुवर्षे विश्वस्तपदावर ठाण मांडून राहता येणार असून, नव्या व्यक्तींचा प्रतिष्ठानमधील प्रवेश दुर्लभ होण्याची भीती सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)ही काही सोसायटी नाही...या घटनादुरुस्तीतून कुसुमाग्रजांच्या मूळ हेतू वा विचारांना धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. वेळोवेळी गरजेनुसार घटनेत दुरुस्ती व्हावी, अशीच त्यांची भूमिका होती. हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे, एखादी सोसायटी नाही, की जिचे संचालक दर तीन वर्षांनी बदलावेत. प्रतिष्ठानची निर्णयप्रक्रिया दीर्घकालीन असते. तिच्यात सातत्य राहावे, यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे. यासंदर्भातील ठराव विश्वस्तांच्या बैठकीत मंजूर झालेला आहे. यात बेकायदेशीर काहीही नाही. सगळे विश्वस्त खाऊन-पिऊन सुखी आहेत. प्रतिष्ठानमध्ये गेल्या २५ वर्षांत एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग हे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले काय?- मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष, प्रतिष्ठान