शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापर संस्थाही आंदोलनाच्या पावित्र्यात

By admin | Updated: October 25, 2015 22:28 IST

करारानुसार मंजूर पाण्याचा कोटा मिळावा

गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याच्या विषयावरून नाशिक - नगर - औरंगाबाद असा तणाव निर्माण झालेला असतानाच गंगापूर धरणावर अवलंबून असलेल्या पाणीवापर सहकारी संस्थांनीही त्यात उडी घेऊन पाटबंधारे खात्याशी केलेल्या कराराप्रमाणे मंजूर पाण्याचा कोटा मिळावा या मागणीसाठी दंड थोपटले आहेत. या संस्थांच्या म्हणण्यानुसार १६ वर्षांपूर्वी सरकारी धोरणाप्रमाणे पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून, जलसंपदा विभागाबरोबर पाणी कोट्याचे करारही करण्यात आले आहेत. गंगापूर धरणाच्या कार्यक्षेत्रातील डावा तट कालव्यावर असलेल्या या संस्थांमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा उभ्या राहिल्या आहेत त्यात दरवर्षी वाढ होत आहे, मात्र पाण्याचा कोटा आहे तितकाच असून, मंजूर पाण्यापेक्षा कमीच पाणी या संस्थांना मिळत आहेत. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने द्राक्षबागांची परिस्थिती बिकट असून, पाण्याअभावी त्या नष्ट होण्याची भीती अधिक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व वातावरणातील बदलाचा सामना करीत शेतकऱ्यांनी कशा तरी द्राक्षबागा जगविल्या आहेत, त्यासाठी कर्जही काढण्यात आले आहे. सध्या या द्राक्षबागांना पाण्याची गरज असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे. डावा तट कालव्यावर असलेल्या या द्राक्षबागांमुळे दरवर्षी एक ते दीड लाख शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो, पाणी न मिळाल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पाणीवाटप सहकारी संस्थांना त्यांच्या मंजूर कोट्याइतके पाणी मिळावे व ज्या संस्थांच्या कार्यक्षेत्रात फळपिकांच्या लागवडीत वाढ झाली, त्यांना पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संस्थांनी त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.