शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

By admin | Updated: September 9, 2015 21:54 IST

समाधान : पिंपळगाव, लासलगावसह निफाड तालुक्यात मुसळधार

लासलगाव : बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लासलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शेतकरीवर्गाने वेळेवर महागडी बियाणे आणून ही बियाणे मोठ्या आशेने पेरली. दररोज आकाशाकडे नजरा लावून शेतकरी पावसाच्या सरींची चातकासारखी वाट बघत आहे. परंतु पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. या वर्षी प्रथमच रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.पावसामुळे बुधवारी पहाटे लासलगाव - कोटमगाव रस्त्यावर मोठा वृक्ष एका दुकानासमोर कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतातील कांदा रोपांना टॅँकर विकतचे पाणी आणून रोपे वाचवत होते. त्यांना थोडाफार सुटकेचा नि:श्वास सोडला. शेतातील सोयाबीन, मका, कांदा यांना दिलासा मिळाला आहे, तर यावेळी खरीप पीक धोक्यात आले. पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिके येणार की नाही याची काळजी निर्माण झाली असताना आॅक्टोबर महिन्याच्या द्राक्षबागा छाटणीचे शेड्युल ठरविता येत नव्हते. पाण्याची समस्या निर्माण झाली तर पीक कसे जगवावे या विवंचनेत शेतकरी होते. परंतु मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काही प्रमाणात द्राक्ष उत्पादकांनी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन करीत आहेत. पूर्वाच्या पावसामुळे रब्बीच्या आशा खामखेडा : सुरवातीच्या कमी पावसामुळे खरिपांची पिके हातातून गेली; परंतु या पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चालूवर्षी सुरुवातीची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने मध्यंतरी झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्याने शेतात खरीप पिकांची पेरणी केली. खरिपाची पिके उगवली; परंतु खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली. पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ झाली नाही आणि दाणा भरण्याच्या आत पिके कोमेजून गेल्याने खरिपाची पिके हाती आली नाही. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पूर्वाच्या पावसाने हजेरी लावल्याने तूर्त लावणीला आलेली कांद्याचे रोपे, लागवड केलेला कांदा आदिंना जीवदान मिळाले आहे. या पावसाने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पूर्वाच्या नंतर हस्ती,उत्तरा , चित्र ,हे महत्वाची पावसाचे नक्षत्र अजुन बाकी आहेत.या नक्षत्राचा पाऊस जोरदार असतो. जर या नक्षत्रामध्ये जर जोरदार पाऊस झाला ,तर नदी ,शिवारातील बांध,नाल्ये पाण्याने तुडुब भरून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिणा पानी उतरते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात गव्हू,हरभरा रागडा कांदा व त्याच बरोबर महत्वाचा आशे उन्हाळी कांदा चे पिक घेता येईल.या पूर्वाच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.