शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

By admin | Updated: September 9, 2015 21:54 IST

समाधान : पिंपळगाव, लासलगावसह निफाड तालुक्यात मुसळधार

लासलगाव : बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लासलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शेतकरीवर्गाने वेळेवर महागडी बियाणे आणून ही बियाणे मोठ्या आशेने पेरली. दररोज आकाशाकडे नजरा लावून शेतकरी पावसाच्या सरींची चातकासारखी वाट बघत आहे. परंतु पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. या वर्षी प्रथमच रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.पावसामुळे बुधवारी पहाटे लासलगाव - कोटमगाव रस्त्यावर मोठा वृक्ष एका दुकानासमोर कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतातील कांदा रोपांना टॅँकर विकतचे पाणी आणून रोपे वाचवत होते. त्यांना थोडाफार सुटकेचा नि:श्वास सोडला. शेतातील सोयाबीन, मका, कांदा यांना दिलासा मिळाला आहे, तर यावेळी खरीप पीक धोक्यात आले. पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिके येणार की नाही याची काळजी निर्माण झाली असताना आॅक्टोबर महिन्याच्या द्राक्षबागा छाटणीचे शेड्युल ठरविता येत नव्हते. पाण्याची समस्या निर्माण झाली तर पीक कसे जगवावे या विवंचनेत शेतकरी होते. परंतु मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काही प्रमाणात द्राक्ष उत्पादकांनी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन करीत आहेत. पूर्वाच्या पावसामुळे रब्बीच्या आशा खामखेडा : सुरवातीच्या कमी पावसामुळे खरिपांची पिके हातातून गेली; परंतु या पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चालूवर्षी सुरुवातीची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने मध्यंतरी झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्याने शेतात खरीप पिकांची पेरणी केली. खरिपाची पिके उगवली; परंतु खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली. पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ झाली नाही आणि दाणा भरण्याच्या आत पिके कोमेजून गेल्याने खरिपाची पिके हाती आली नाही. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पूर्वाच्या पावसाने हजेरी लावल्याने तूर्त लावणीला आलेली कांद्याचे रोपे, लागवड केलेला कांदा आदिंना जीवदान मिळाले आहे. या पावसाने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पूर्वाच्या नंतर हस्ती,उत्तरा , चित्र ,हे महत्वाची पावसाचे नक्षत्र अजुन बाकी आहेत.या नक्षत्राचा पाऊस जोरदार असतो. जर या नक्षत्रामध्ये जर जोरदार पाऊस झाला ,तर नदी ,शिवारातील बांध,नाल्ये पाण्याने तुडुब भरून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिणा पानी उतरते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात गव्हू,हरभरा रागडा कांदा व त्याच बरोबर महत्वाचा आशे उन्हाळी कांदा चे पिक घेता येईल.या पूर्वाच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.