शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST

दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख असून, पर्जन्यमान सरासरी ४८८ मिलीमीटर इतके आहे, अशाही परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा ...

दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख असून, पर्जन्यमान सरासरी ४८८ मिलीमीटर इतके आहे, अशाही परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत शेतात नवनवीन प्रयोग करून आधुनिक शेतीची कास धरत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

येवला तालुक्यात खरीप हंगामात मका, सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांबरोबरच बाजरी, भुईमूग, मूग या पिकांचा पेरा जास्त असतो, यावर्षी खरिपासाठी मका चाळीस हजार हेक्टर, कपाशी नऊ हजार हेक्टर, सोयाबीन सात हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. याचबरोबर तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला पिकाकडे वळले असून, टोमॅटो, ढोबळी मिरची, सिमला मिरची, मिरची, वालवड, भोपळे, कारले, दोडके, गिलके तसेच शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होत असते, टोमॅटो लागवडीच्या क्षेत्रात तर दरवर्षी वाढ होत आहे. यापासून तीन ते चार महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल वाढला आहे, तर खरीप हंगामातील मुख्य व नगदी पीक असलेल्या कांदा लागवडीला प्राधान्य दिले जाते. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कांदा रोपांसाठी उळे टाकले जातात. साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पोळ कांदा लागवड केली जाते.

मागील वर्षापासून जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शेतकरीवर्ग आणखीनच संकटात सापडला आहे.

लासलगावी पावसाचा जोर

लासलगाव : रोहिणी नक्षत्राच्या पावसाने मंगळवारी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात असलेला उष्मा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ३ वाजेनंतर आकाशात अंधारून आले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. बाळगोपाळांनी पावसाची मजा लुटली. ४ वाजता सुरू झालेला पाऊस ६ वाजले तरी सुरूच होता. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे. दुकाने व लिलावाचे काम दुपारनंतर बंद झाले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिक असल्याने नागरिकांवर आहे त्याठिकाणी थांबून राहायची वेळ आली.