शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शिक्षक बदली प्रक्रियेलाच आव्हान देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:28 IST

शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर संशय व्यक्त होत असतांनाच आता ही संपूर्ण बदली प्रक्रियाच रद्द करण्यासाठी राज्यव्यापी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. शासनाने केलेल्या बदलीला हरकत घेणारी याचिका लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे समजते.

नाशिक : शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर संशय व्यक्त होत असतांनाच आता ही संपूर्ण बदली प्रक्रियाच रद्द करण्यासाठी राज्यव्यापी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. शासनाने केलेल्या बदलीला हरकत घेणारी याचिका लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे समजते. २७ फेबुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यामुळे शासनाने आॅनलाइन पद्धतीने केलेल्या बदल्या या नियमबाह्ण असल्याचा मुद्दा न्यायालयापुढे मांडण्याचा विचार शिक्षक संघटनांनी केला आहे. शासनाने बदल्या करताना अनेक नियमबाह्ण प्रकार केले आहेत. विशेष म्हणजे शासनाने शिक्षक बदल्यांचा अधिकृत कार्यक्रम शासनाने जाहीर केलेला नव्हताच असा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. दुसरी बाब म्हणजे बदली कायद्यानुसार केवळ ३० टक्के बदल्या करता येतात परंतु शिक्षक बदलीमध्ये असा कोणताच नियम पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील सर्व शिक्षक बदलून गेले आहेत. अशा ठिकाणी सर्व शिक्षक नवीनच रुजू झाले आहेत.पती-पत्नी एकत्रीधोरण बदलीमध्ये शंभर टक्के पाळण्यात आले नाही. किंवा राबविण्यातच आलेले नाही. पती-पत्नी एकत्रीकरणाचा नियम असतानाही बदली करताना मात्र अनेक पती-पत्नींवर अन्याय झालेला आहे. विशेष म्हणजे इतके वर्ष ते एकत्रीकरणाची अपेक्षा करून होते त्यांना पुन्हा पुढील तीन ते चार वर्ष एकत्र येताच येणार नाही असा घोळ बदल्यांमध्ये झाला आहे. शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमुळे एका शिक्षकाने चुकीची माहिती भरली असली असेल तर त्याच्यामुळे ३० ते ३५ शिक्षक बाधित झाले आहेत. याशिवाय बोगस शिक्षक बदली तपासण्याची सक्षम यंत्रणाच जिल्हा परिषदांकडे नाही. या बदलीमुळे कनिष्ठ आणि सेवा ज्येष्ठता शिक्षकांमध्येदेखील भेदभाव झाला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या न केल्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांनी दिलेले विकल्प टळून कनिष्ठ शिक्षकांना त्या जागा मिळाल्या आहेत.गिते यांच्या भूमिकेवर नाराजीअमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संशयास्पद बदली आाणि खोटी माहिती भरून सोयीचे ठिकाण निवडणाºया शिक्षकांवर तडकाफडकी कारवाई केल्याचे समजते. त्यांनी अशा शिक्षकांची बदली अवघड क्षेत्रात करून पाच वर्षांसाठी बदलीसाठी अपात्र ठरविले असून, त्यांना कार्यमुक्तदेखील केले आहे; मात्र नाशिक जिल्हा परिषदेकडून शिक्षकांसंदर्भातील कोणतीही कारवाई होत नसल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांना सुनावणी प्रक्रियेविषयी संशय आहे. हा संशय दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही भूमिका घेत नसून तक्रारदारांंचे समाधान व्हावे यासाठी नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे ठाम भूमिका घेताना दिसत नसल्याचा शिक्षकांचा रोष आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद