शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजपावर कुरघोडीची सेनेची तयारी

By admin | Updated: December 15, 2015 22:45 IST

दुष्काळ : उद्धव ठाकरेंसह मंत्री, आमदारांचा गट जिल्हा दौऱ्यावर

नाशिक : शेतकरी आत्महत्त्येच्या जिल्ह्यात वाढलेल्या घटना, अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेले शेतकरी व पाणीटंचाईचे भीषण संकट पुढे उभे ठाकले असताना भाजपाचे पालकमंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने कुरघोडी करण्याची तयारी केली आहे. मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री व आमदार येत आहे.या दौऱ्यात शासकीय यंत्रणांच्या बैठका घेऊन त्यांना कार्यान्वित करण्यात करण्यात येणार आहे. या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील विधान परिषद व विधानसभेचे सदस्य सहभागी होणार आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर अशाच प्रकारे शिवसेनेचे मंत्रिगट गेलेले असताना त्यावर भाजपाने आक्षेप घेत खिल्ली उडविली होती व त्यातून बरेच राजकीय वातावरण तप्त झाले होते, त्याच धर्तीवर सेनेच्या मंत्री, आमदारांची नाशिक भेटही गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्णात चालू वर्षी ६० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भाजपाचा एकही मंत्री वा आमदार जिल्ह्णात फिरकला नाही. अशा परिस्थितीत सेनेने थेट मंत्र्यांसह आमदारांनाच शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचे ठरविले आहे. शिवाय सरकारी यंत्रणेला कामाला लावून त्याचा राजकीय फायदाही या दौऱ्यात पदरात पाडून घेणे शक्य होणार आहे. भाजपाने काही केले नाही, पण आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो, असा संदेश या माध्यमातून जाण्याची व्यवस्था सेनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार शुक्रवारी सायंकाळपर्यंत नाशिकला येणाऱ्या सेनेच्या मंत्रिगटाने शनिवारी शासकीय यंत्रणेची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाणीटंचाई व त्या संदर्भातील उपाययोजना, टॅँकरस्थिती, शेतकरी आत्महत्त्या, रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी, दुष्काळसदृश जाहीर केलेल्या गावांसंदर्भात प्रस्तावित उपाययोजना, चारा टंचाई, कृषी वीजजोडणी संदर्भातील माहिती, शेतकऱ्यांच्या विविध योजनांची अंमलबजावणी, जलयुक्त शिवार योजनेची कामे, कांदाचे उत्पादन व भाव याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर ही समिती काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्याचबरोबर आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे.