शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

राष्टÑवादीची निवडणूक तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:56 IST

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.

ठळक मुद्देपक्षाने ओढवून घेतलेली नाराजी

जातीय, भौगोलिक समीकरणे : एकमेकांवर पक्षांतर्गत ‘चेकमेट’पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने 

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.नाशिकच्या राष्टÑवादी कॉँग्रेसवर भुजबळ यांचे वर्चस्व निर्विवाद असल्यामुळे मुंबईतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नियुक्त्यांच्या घोषणा केल्या असल्या तरी, त्यास भुजबळ यांची संमती असल्याशिवाय ते होणे शक्य नसल्याचे नूतन पदाधिकारीही जाणून आहेत. पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या फेरबदलात सामाजिक, जातीय व भौगोलिक समीकरणाचा मेळ घालण्यात आला आहे.नाशिक लोकसभेची जागा भुजबळ कुटुंबीयातील कोण लढविणार याबाबत कमालीची उत्सुकता व तितकीच गोपनियता पाळण्यात येत असली तरी, या लोकसभेत मोडणारे विधानसभेचे मतदारसंघ व त्यातील जातीय समीकरणे पाहता, कोंडाजी मामा आव्हाड यांना अध्यक्षपदी नेमण्यामागचा राष्टÑवादीचा हेतू लपून राहिलेला नाही. परंतु असे करत असताना विशिष्ट समाजाला झुकते माप दिल्याचा आक्षेप खोडून काढण्यासाठी विष्णुपंत म्हैसधुणे यांना कार्याध्यक्ष करून दोन समाजात समानता साधण्यात आली आहे.असाच काहीसा प्रकार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादीकडून चांगली लढत देऊन दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. गेल्या साडेचार वर्षांत पवार यांनी या मतदारसंघाशी आपली नाळ कायम ठेवल्यामुळे आगामी निवडणुकीतही त्याच उमेदवार असतील असे आत्तापासूनच गृहीत धरले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करून राष्टÑवादीने दोन्ही गोेष्टी साध्य केल्या आहेत.दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या अधिक असून, त्या खालोखाल निफाड, येवला, चांदवड या मतदारसंघातील मराठा मतदारांची संख्या लक्षात घेता रवींद्र पगार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या नवीन नियुक्त्यांबद्दल काही कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर प्रकट होताना दिसत आहे.पगार यांच्या कार्यकक्षेला मर्यादाभौगोलिक समतोल साधण्यात आला असला तरी, जिल्ह्याची गेल्या दोन टर्म एकतर्फी जबाबदारी पेलणाºया रवींद्र पगार यांच्याकडील जबाबदारी आता कमी करून एकप्रकारे त्यांच्या कार्यकक्षेला मर्यादा घालण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. परंतु या पदांसाठी गेल्या वर्षभरापासून बाश्ािंग बांधून बसलेल्यांची पक्षाने ओढवून घेतलेली नाराजी दूर करण्याची जबाबदारी मात्र आता नूतन पदाधिकाºयांवर येऊन पडली आहे.