शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी

By admin | Updated: September 16, 2016 22:29 IST

नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे २४ सप्टेंबरपासून आठवडे बाजार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्यावसायिकांनी या बाजारात सहभागी होण्याचे आवाहन नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे १५ गावांचे केंद्रबिंदू म्हणून नायगाव पूर्वीपासून ओळखले जाते. ७०च्या दशकात या ठिकाणी जनावरांच्या खरेदी - विक्रीसह सर्वच बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याचे सांगण्यात येते. नायगाव पंचक्रोशीच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, दळणवळण वाढले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या नायगाव खोऱ्यात वाढली आहे. त्याचबरोबरच नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक नवीन व्यवसाय येथे वाढले आहेत. परिसरातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, शिंदे, जाखोरी, दारणासांगवी, जोगलटेंभी, सावळी, पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर येथील नागरिकांची बँक, सोसायटी, शाळा, बाजारहाट आदिंसह विविध कामांसाठी नायगाव येथे वर्दळ असते. सिन्नर, नाशिकरोड, सायखेडा या बाजारपेठांऐवजी नायगाव येथूनच भाजीपाला, किराणा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, शेतोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नायगाव येथे पूर्वीप्रमाणेच आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. (वार्ताहर)