शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान

By admin | Updated: May 13, 2014 00:11 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही. आगामी तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी जुलै ते डिसेंबर या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहेे. जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने साधारणत: जूनमध्येच मतदान घेण्याचा आयोगाचा इरादा असून, त्यासाठी येत्या २० मेपासूनच ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे तेथे प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार याद्याच त्यासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत; परंतु प्रभागनिहाय जाहीर होणार्‍या याद्यांबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असतील त्या त्यांनी तहसिलदारांकडे नोंदवायच्या आहेत. या हरकतींमध्ये नवीन मतदाराचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही, फक्त नावातील बदल, प्रभागात बदल अशा जुजबी दुरुस्ती मतदार याद्यांमध्ये केल्या जातील त्यासाठी मात्र मतदाराला लिखीत स्वरूपात हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. २६ मेपर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार असून, ३० मेपर्यंत हरकतींची सुनावणी करून, त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नाशिक जिल्‘ातील ७६ ग्रामपंचायतींची या काळात मुदत संपुष्टात येत असून, त्यात इगतपुरी- ३८, निफाड- २१, नाशिक- ३, त्र्यंबक- ३, कळवण- १० व मालेगाव तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. राज्य आयोगाच्या सूचना प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.