शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

जिल्‘ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान

By admin | Updated: May 13, 2014 00:11 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा‘ धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही. आगामी तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी जुलै ते डिसेंबर या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहेे. जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने साधारणत: जूनमध्येच मतदान घेण्याचा आयोगाचा इरादा असून, त्यासाठी येत्या २० मेपासूनच ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे तेथे प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार याद्याच त्यासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत; परंतु प्रभागनिहाय जाहीर होणार्‍या याद्यांबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असतील त्या त्यांनी तहसिलदारांकडे नोंदवायच्या आहेत. या हरकतींमध्ये नवीन मतदाराचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही, फक्त नावातील बदल, प्रभागात बदल अशा जुजबी दुरुस्ती मतदार याद्यांमध्ये केल्या जातील त्यासाठी मात्र मतदाराला लिखीत स्वरूपात हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. २६ मेपर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार असून, ३० मेपर्यंत हरकतींची सुनावणी करून, त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नाशिक जिल्‘ातील ७६ ग्रामपंचायतींची या काळात मुदत संपुष्टात येत असून, त्यात इगतपुरी- ३८, निफाड- २१, नाशिक- ३, त्र्यंबक- ३, कळवण- १० व मालेगाव तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. राज्य आयोगाच्या सूचना प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.