नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त केल्या जात असलेल्या विकासकामांमध्ये व नियोजनामध्ये लोकसहभागाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, कुंभमेळ्याच्या संबंधित कामे करण्याची जबाबदारी शासनाची व प्रशासकीय यंत्रणेची असली तरी, कामे करताना नागरिकांची, तसेच संबंधित जाणकारांची मदत घेतली जावी. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार असल्यामुळे ही कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत. त्यात भ्रष्टाचाराला वाव नसावा यासाठी समिती गठीत करावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)