शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:12 IST

कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादक धास्तावले : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी कसरत

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ तर कधी हवेत गारवा आणि धुके निर्माण होत आहे. त्यात भर पडली ती अवकाळी पावसाच्या सरींची. यामुळे द्राक्षांसह इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू झाली आहे. आधीच विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केल्यानंतर पिकांना आता अवकाळीने घेरल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यानंतर या पिकातून उत्पादन खर्च देखील फिटला नसतानाच त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या हजेरीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकºयावर आली असून, दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पिके जगवावीत कशी, हा यक्षप्रश्न शेतकºयांना पडलेला दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्याला यंदा आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असतानाकांदा लागवडीसाठी रोपांचीवानवा भासत आहे. यंदा कांद्याचे दर हे मागील काही दिवसांपासून तेजीत असल्याने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पाणी फेरले असून, यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्वसामान्य शेतकºयांना आवाक्याबाहेर झाले आहे.मिळेल त्या किमतीत कांदा रोपाची खरेदीकांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरीवर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करीत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे, अशा ठिकाणीसुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याच्या बियाणाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून, महागड्या दराने बी घेऊन कांदा लागवडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना अवकाळी पावसाची शेतकºयांनी धास्ती घेतली आहे.द्राक्षबागेला फळ लागले असून, ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने द्राक्षबाग वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असून, शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके, द्राक्ष उत्पादक, मानोरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती