शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:12 IST

कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादक धास्तावले : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी कसरत

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ तर कधी हवेत गारवा आणि धुके निर्माण होत आहे. त्यात भर पडली ती अवकाळी पावसाच्या सरींची. यामुळे द्राक्षांसह इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू झाली आहे. आधीच विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केल्यानंतर पिकांना आता अवकाळीने घेरल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यानंतर या पिकातून उत्पादन खर्च देखील फिटला नसतानाच त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या हजेरीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकºयावर आली असून, दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पिके जगवावीत कशी, हा यक्षप्रश्न शेतकºयांना पडलेला दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्याला यंदा आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असतानाकांदा लागवडीसाठी रोपांचीवानवा भासत आहे. यंदा कांद्याचे दर हे मागील काही दिवसांपासून तेजीत असल्याने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पाणी फेरले असून, यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्वसामान्य शेतकºयांना आवाक्याबाहेर झाले आहे.मिळेल त्या किमतीत कांदा रोपाची खरेदीकांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरीवर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करीत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे, अशा ठिकाणीसुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याच्या बियाणाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून, महागड्या दराने बी घेऊन कांदा लागवडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना अवकाळी पावसाची शेतकºयांनी धास्ती घेतली आहे.द्राक्षबागेला फळ लागले असून, ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने द्राक्षबाग वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असून, शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके, द्राक्ष उत्पादक, मानोरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती