शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मान्सूनपूर्व पावसाने पाच जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत ...

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत उडून गेल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे किरकोळ नुकसानदेखील झाले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बरसात झाल्याने अनेक तालुक्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांच्या पोल्ट्री तसेच शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गोठे तसेच घरांचे पत्रेदेखील उडाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. विजांचा कडकडाट तसेच जोरदार वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने काही ठिकाणी वृक्षदेखील उन्मळून पडली. या पावसामुळे पाच दुभती जनावरे दगावली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये पाच, सुरगाणा येथे तीन, सिन्नर तालुक्यात दोन, तर कळवण आणि दिंडोेरी येते प्रत्येकी एक याप्रमाणे घरांची पत्रे उडाली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये एकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळच्या सत्रात ऊन आणि दुपारनंतर जोरदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या पावसाचा मोठा फटका बसला. अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच दळणवळणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. जाेरदार वाऱ्यामुळे काही घरांच्या छताचा भाग उडून गेला तर भिंतींचीही काही ठिकाणी पडझड झाली. यारोबरच पोल्ट्री फार्मला चांगलाच फटका बसला. दिंडोरी, सिन्नर येथील पोल्ट्रींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने या तालुक्याांना फटका बसला. अगोदरच तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकरी सावरत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीत भर पडली आहे. शहरालादेखील पावसाने झोडपून काढले मात्र ग्रामीण भागात या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समेार आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. मुसळधार पावसाने अेाढ्यांना पूर आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे डोळओहळ या ठिकाणी भगवान घाटाळ हे पुरात वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवला आहे.