शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

मान्सूनपूर्व पावसाने पाच जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत ...

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत उडून गेल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे किरकोळ नुकसानदेखील झाले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बरसात झाल्याने अनेक तालुक्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांच्या पोल्ट्री तसेच शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गोठे तसेच घरांचे पत्रेदेखील उडाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. विजांचा कडकडाट तसेच जोरदार वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने काही ठिकाणी वृक्षदेखील उन्मळून पडली. या पावसामुळे पाच दुभती जनावरे दगावली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये पाच, सुरगाणा येथे तीन, सिन्नर तालुक्यात दोन, तर कळवण आणि दिंडोेरी येते प्रत्येकी एक याप्रमाणे घरांची पत्रे उडाली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये एकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळच्या सत्रात ऊन आणि दुपारनंतर जोरदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या पावसाचा मोठा फटका बसला. अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच दळणवळणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. जाेरदार वाऱ्यामुळे काही घरांच्या छताचा भाग उडून गेला तर भिंतींचीही काही ठिकाणी पडझड झाली. यारोबरच पोल्ट्री फार्मला चांगलाच फटका बसला. दिंडोरी, सिन्नर येथील पोल्ट्रींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने या तालुक्याांना फटका बसला. अगोदरच तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकरी सावरत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीत भर पडली आहे. शहरालादेखील पावसाने झोडपून काढले मात्र ग्रामीण भागात या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समेार आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. मुसळधार पावसाने अेाढ्यांना पूर आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे डोळओहळ या ठिकाणी भगवान घाटाळ हे पुरात वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवला आहे.