शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

मान्सूनपूर्व पावसाने पाच जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत ...

नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत उडून गेल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे किरकोळ नुकसानदेखील झाले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बरसात झाल्याने अनेक तालुक्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांच्या पोल्ट्री तसेच शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गोठे तसेच घरांचे पत्रेदेखील उडाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. विजांचा कडकडाट तसेच जोरदार वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने काही ठिकाणी वृक्षदेखील उन्मळून पडली. या पावसामुळे पाच दुभती जनावरे दगावली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये पाच, सुरगाणा येथे तीन, सिन्नर तालुक्यात दोन, तर कळवण आणि दिंडोेरी येते प्रत्येकी एक याप्रमाणे घरांची पत्रे उडाली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये एकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळच्या सत्रात ऊन आणि दुपारनंतर जोरदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या पावसाचा मोठा फटका बसला. अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच दळणवळणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. जाेरदार वाऱ्यामुळे काही घरांच्या छताचा भाग उडून गेला तर भिंतींचीही काही ठिकाणी पडझड झाली. यारोबरच पोल्ट्री फार्मला चांगलाच फटका बसला. दिंडोरी, सिन्नर येथील पोल्ट्रींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने या तालुक्याांना फटका बसला. अगोदरच तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकरी सावरत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीत भर पडली आहे. शहरालादेखील पावसाने झोडपून काढले मात्र ग्रामीण भागात या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समेार आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. मुसळधार पावसाने अेाढ्यांना पूर आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे डोळओहळ या ठिकाणी भगवान घाटाळ हे पुरात वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवला आहे.