शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने बनविली नाशिकची प्रभागरचना

By admin | Updated: September 15, 2016 01:03 IST

शिवसेनेचा आक्षेप : सोयीने केलेल्या मोडतोडीविषयी तक्रार

र्नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभागरचना कितीही गोपनीय असल्याचा दावा केला जात असला तरी ती फुटली असून भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या सोयीने प्रभाग बनवून घेतल्याचा आक्षेप शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून शासनामार्फत नवीन प्रभागरचना तयार करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान भोगे, रिमा भोगे, हरिभाऊ लासूरे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी ही तक्रार नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी प्रभागाचे प्रारूप तयार करून महापालिकेने निवडणूक आयुक्तांना सादर केले आणि त्यांनी छाननी करून ते राज्य निवडणूक आयोगाला सादर केले आहे. मात्र, भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या सोयीने प्रभागरचना केल्याचे ते स्वत:च फुशारकीने सांगत आहेत, त्यांनी ज्या प्रकारची रचना केली आहे ती खरी आहे किंवा नाही याबाबत कानोसा घेतला असता, त्यात आमच्या स्तरावर तथ्य आढळले आहे. परंतु आता विभागीय आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाकडे असलेल्या प्रतींची छाननी करावी आणि फेररचना करावी, अशी मागणी या माजी नगरसेवकांबरोबरच मुकुंद कांबरी, सचिन टिळे, सचिन परदेशी, दिलीप मोरे यांच्या सह्या आहेत.शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपले नातेवाईक असलेले नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांची बदली होऊ दिली नाही. उलट त्यांना या विभागाचे प्रमुख करून त्यांच्या मदतीनेच सोयीची प्रभाग रचना करून घेतली. यात पंचवटीत वाघाडी नदीपासून पश्चिमेकडील वाल्मीकनगर, संजयनगर, मजूरवाडी, राजवाडा, अवधूतवाडी अशा सर्व झोपडपट्ट्या एकत्र करून एकच प्रभाग केला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाच प्रभागांची मोडतोड करून हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रभागरचनेत गुजराथी मतदारच कसे मोठ्या संख्येने राहतील अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. ही प्रभागरचना करताना नदी ओलांडणे किंवा महामार्ग ओलांडणे, जनगणनेचे ब्लॉक तोडणे, लोकसंख्येचे संतुलन असे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रभागरचना केल्याचा आरोप करण्यात आला असून राजकीय दबावाखाली तयार केलेली प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)