शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नाही : आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:31 IST

आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.सिडको येथे अश्विननगरात ‘जीवन जीने की जडीबुटी’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत महाराज बोलत होते. यावेळी पुढे बोलताना महाराज म्हणाले की, जीवनामध्ये चार प्रमुख मूल्य आहेत. विचार, विवेक, वात्सल्य, पराक्रम ही मूलतत्त्वे आहेत. या मूल्यांवर विचार केलातर आपले जीवन पवित्र होण्यास मदत होईल. पूर्वीच्या जमान्यात पैसे कमी मिळत होते, पण प्रसन्नता खूप होती. यावेळी स्वागत प्रवीण जैन, प्रीती जैन यांनी केले. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, महेश हिरे, नगरसेवक गोविंद घुगे, नगरसेवक किरण गामणे, विकास शहा, राजेंद्र शहा, गौतम सुराणा, अनिल नहार, महेश शहा, शेखर सराफ, राजन पारीख आदींसह भाविक उपस्थित होते. आज व्यवसाय कितीही होवो, आपणास समाधान मिळत नाही. गुटखा, पान-मसाला, सिगारेटमुळे मजा वाटत असेल, परिणाम मात्र कॅन्सर आहे. याचा कधी विचार केला काय? आपण संसारात आहात, पण सुख, चैनीच्या वस्तू जीवन बरबाद करून टाकतात. आपली जीवनशैली बदलवायची असेल तर प्रथम आपण बदलले पाहिजे, मग दुसऱ्याचा विचार करा, असे आवाहन आचार्यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक