शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

------ जनावरे चोरीचे प्रकार वाढले मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व ...

------

जनावरे चोरीचे प्रकार वाढले

मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व गोठ्यात बांधलेली जनावरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. जनावरांची तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

------

रेशनचे धान्य खुल्या बाजारात

मालेगाव : सध्या शासनाकडून व रास्त दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. शासनाने कोविड काळात मोफत व वाढीव धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सहा महिन्यांपासून लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे; मात्र लाभार्थींकडे पुरेसा धान्यसाठा झाल्याने जमा झालेले धान्य खुल्या बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

-----

उड्डाणपुलाचे काम संथ गतीने

मालेगाव : शहरात २३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाबाबत महासभेत वारंवार चर्चा झाली. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील काम संथ गतीने सुरू आहे.

------

बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ

मालेगाव : शहर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाले आहे. परिणामी आबालवृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

-----

इंधनच्या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त

मालेगाव : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर शासनाने घरगुती गॅसच्या दरातही वाढ केली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडून पडणार आहेत.

-----

किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

मालेगाव : शहरातील किदवाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेकडे वारंवार अतिक्रमणे हटविण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून थातूरमातूर कारवाई केली जात आहे. पथकाची पाठ फिरताच नागरिकांकडून पुन्हा अतिक्रमणे केली जात आहेत. हा रस्ता मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.