शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

------ जनावरे चोरीचे प्रकार वाढले मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व ...

------

जनावरे चोरीचे प्रकार वाढले

मालेगाव : शेतीशिवारात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेले जात आहेत. रस्त्याकडेला व गोठ्यात बांधलेली जनावरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. जनावरांची तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

------

रेशनचे धान्य खुल्या बाजारात

मालेगाव : सध्या शासनाकडून व रास्त दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. शासनाने कोविड काळात मोफत व वाढीव धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सहा महिन्यांपासून लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे; मात्र लाभार्थींकडे पुरेसा धान्यसाठा झाल्याने जमा झालेले धान्य खुल्या बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

-----

उड्डाणपुलाचे काम संथ गतीने

मालेगाव : शहरात २३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाबाबत महासभेत वारंवार चर्चा झाली. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील काम संथ गतीने सुरू आहे.

------

बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ

मालेगाव : शहर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ व रोगट हवामान निर्माण झाले आहे. परिणामी आबालवृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

-----

इंधनच्या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त

मालेगाव : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर शासनाने घरगुती गॅसच्या दरातही वाढ केली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडून पडणार आहेत.

-----

किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

मालेगाव : शहरातील किदवाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेकडे वारंवार अतिक्रमणे हटविण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून थातूरमातूर कारवाई केली जात आहे. पथकाची पाठ फिरताच नागरिकांकडून पुन्हा अतिक्रमणे केली जात आहेत. हा रस्ता मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.