शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:02 IST

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देगावठी कोंबड्यांचेही पालक करत आहे; परंतु शेतीचा विकास होत गेल्याने या शेतीपूरक जोडधंद्यांमघ्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसाय गरज भासू लागल्याने, शेतकरी वेगवेगळ्या व्यवसात साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागल्याने खा

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी, म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्याचबरोबर या पोल्ट्री बांधकामासाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु या पोल्ट्री शेड उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. परंतु यासाठी गावातील सोसायटी, बँक आदी कर्ज देऊ लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.या पोल्ट्री व्यवसाय अनेक कंपन्या कोंबडीचे पिल्ले त्यांच्यासाठी लागणारे खाद्य आदी पुरवितात. वेळच्यावेळी कंपनीचे डॉक्टर या पोल्ट्री शेडला भेटी देऊन पिलांची देखभाल करतात. पोल्ट्री मालकाने पिलांना दररोज पाणी, खाद्य आदी संगोपन करावे लागते. याच्या मोबदल्यात पोल्ट्री मालकाला प्रतिकिलोमागे विशिष्ट कमिशन दिले जाते. तसेच सध्या पशुधन कमी झाल्याने शेतीसाठी शेणखत मिळत नाही. तेव्हा या पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.परंतु चालू वर्षी वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. उष्ण हवामानामुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहे. या उष्ण हवामानाचा कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत.प्रतिक्रि या : पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त उष्ण किवा जास्त ठंड हवामान लागत नाही. यासाठी दमट हवामान पोषक असते. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यात उष्ण वातावरण पोल्ट्री व्यवसाय कसा करावा, याची चिंता लागलेली असल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.नितिन शेवाळे, पोल्ट्री धारक(फोटो ०१ खामखेडा)उन्हापासून पोल्ट्री फार्मवर नारळाच्या फांद्या टाकून पोल्ट्रीतील कोंबडीच्या संरक्षण केले जात आहे.