शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:02 IST

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देगावठी कोंबड्यांचेही पालक करत आहे; परंतु शेतीचा विकास होत गेल्याने या शेतीपूरक जोडधंद्यांमघ्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसाय गरज भासू लागल्याने, शेतकरी वेगवेगळ्या व्यवसात साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागल्याने खा

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी, म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्याचबरोबर या पोल्ट्री बांधकामासाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु या पोल्ट्री शेड उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. परंतु यासाठी गावातील सोसायटी, बँक आदी कर्ज देऊ लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.या पोल्ट्री व्यवसाय अनेक कंपन्या कोंबडीचे पिल्ले त्यांच्यासाठी लागणारे खाद्य आदी पुरवितात. वेळच्यावेळी कंपनीचे डॉक्टर या पोल्ट्री शेडला भेटी देऊन पिलांची देखभाल करतात. पोल्ट्री मालकाने पिलांना दररोज पाणी, खाद्य आदी संगोपन करावे लागते. याच्या मोबदल्यात पोल्ट्री मालकाला प्रतिकिलोमागे विशिष्ट कमिशन दिले जाते. तसेच सध्या पशुधन कमी झाल्याने शेतीसाठी शेणखत मिळत नाही. तेव्हा या पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.परंतु चालू वर्षी वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. उष्ण हवामानामुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहे. या उष्ण हवामानाचा कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत.प्रतिक्रि या : पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त उष्ण किवा जास्त ठंड हवामान लागत नाही. यासाठी दमट हवामान पोषक असते. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यात उष्ण वातावरण पोल्ट्री व्यवसाय कसा करावा, याची चिंता लागलेली असल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.नितिन शेवाळे, पोल्ट्री धारक(फोटो ०१ खामखेडा)उन्हापासून पोल्ट्री फार्मवर नारळाच्या फांद्या टाकून पोल्ट्रीतील कोंबडीच्या संरक्षण केले जात आहे.