शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महिला तलाठी बदलीवरील स्थगिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST

नाशिक: येवला येथील महिला तलाठ्यांच्या बदल्या करताना येवला प्रांतधिकाऱ्यांनी बदली कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत ...

नाशिक: येवला येथील महिला तलाठ्यांच्या बदल्या करताना येवला प्रांतधिकाऱ्यांनी बदली कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत मॅट न्यायालयाने या बदल्यांना स्थगिती दिली आहे.

येवला येथील तलाठ्यांचे बदली प्रकरण सध्या जिल्ह्यात गाजत असून मॅट न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. येवला प्रांताधिकाऱ्यांनी बदली नियमांचा भंग करून आन्यायकारक बदली केल्याचा आरोप करीत तलाठी महिलांनी थेट मॅट न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सोमवारी मुंबईत मॅट न्यायालयात सुनावणी होऊन त्यांच्या बदलीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

महिला तलाठ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करताना येवला प्रांताधिकाऱ्यांनी मुदतपूर्व बदल्यांचा कायदा २००५ च्या कलम ४(५) नुसार जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे अपेक्षित असताना तसे केल्याचे दिसून येत नसल्याचा आक्षेप मॅटच्या न्यायमूर्ती श्रीमती मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने नोंदविला आहे. या आधारावर त्यांनी बदलीला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार असून तोपर्यंत प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या बदली आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

याप्रकरणी याचिकाकर्त्या दोन्ही महिला तलाठी यांच्यावतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला तर राज्य शासनाच्यावतीने ॲड. श्रीमती क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.