शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

संमेलनासाठी आता दिवाळीनंतरचा वायदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय ...

नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबत तसे पत्र नाशिकच्या निमंत्रकांना पाठविले होते. मात्र,कोरोनाची स्थिती आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच विविध समित्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समितीच्या कामकाजाबाबतचा आढावादेखील सादर केला. तारीख निश्चित झाल्यास त्यानंतरच्या पंधरा दिवसात सर्व यंत्रणा सज्ज असेल असा विश्वासदेखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच संमेलनाचे आयोजन हे ऑनलाईन नकोच तर ऑफलाईनच व्हावे, याबाबतही यावेळी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी प्रस्तावित साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नाशिककडून मिळणाऱ्या उत्तरावर संमेलन पुढे अजून काही काळ स्थगित करायचे की नाशिकचे संमेलन रद्दच करायचे, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांकडून येणाऱ्या उत्तरावर संमेलनाबाबतचा पुढील निर्णय ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयावर साहित्य महामंडळ आणि त्याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.