शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अडविल्यास चेंगराचेंगरीची शक्यता

By admin | Updated: July 3, 2015 00:20 IST

जाणकारांचे मत : लाखो भाविकांना अडवून धरणे धोकादायक

नाशिक : ज्या सिंहस्थ कुंभमेळ्याची बारा वर्षे प्रतीक्षा करून रामकुंडात शाहीस्रानाने पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी साधू-संत, तसेच कोट्यवधी भाविकांची चढाओढ सुरू असते, त्या दिवशीच रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्णय अंगलट येण्याची शक्यताच अधिक आहे. मुळात रामकुंड असो वा प्रशासनाने विकसित केलेला नवीन घाट असो गोदावरी गाठण्यासाठी दुतर्फा उताराचेच रस्ते असताना अशा रस्त्यांवर लाखो भाविकांना अडवून नंतर त्यांना स्रानासाठी रस्ता मोकळा केल्यास गर्दीच्या लोंढ्यात चेंगराचेंगरी होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीच्या दिवशी साधू-महंत व बाहेरगावच्या भाविकांच्या स्रानानंतरच नाशिककरांनी रामकुंड परिसरात प्रवेश करावा तोपर्यंत या भागातील रस्ते वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचे नियोजन पोलीस प्रशासन करीत असून, तसे संकेत पोलीस आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. याचाच अर्थ शाही मार्गावरून मिरवणूक निघेल त्या मार्गावरून भाविकांना जाण्यास मज्जाव केला जाईलच; परंतु या मार्गाला जोडणाऱ्या उपरस्त्यांवरही बॅरेकेडिंग केली जाण्याची शक्यता आहे. शाही मिरवणूक मार्ग वगळता अन्य उपरस्त्यांनी भाविकांनी रामकुंडापर्यंत येऊ नये म्हणून कोअर गृप केला जाणार आहे.म्हणजेच रामकुंड, गांधीतलाव व रोकडोबा मैदान या तीनही महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत भाविक साधू-महंतांचे स्रान पूर्ण होईस्तोवर जाऊ शकणार नाही. त्यासाठी गोदावरीला येऊन मिळणारे सर्व रस्ते अडविले जाणार आहेत. एकीकडे शाही पर्वणीच्या दिवशी ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता प्रशासनच व्यक्त करीत असताना काही हजारांच्या घरात संख्या असलेल्या साधू-महंतांच्या स्रानासाठी लाखो भाविकांना तब्बल चार ते पाच तास अडवून धरणे मोठे जिकिरीचे होणार आहे. गोदावरी नदीच्या पात्राकडे जाण्यासाठी येऊन मिळणारे सर्वच रस्ते उताराचे असून, गत सिंहस्थात सरदार चौकातील उतारच दुर्घटनेला कारणीभूत ठरून कुंभमेळ्याला गालबोट लागल्याचा इतिहास आहे. रामकुंडाला पंचवटीकडून येऊन मिळणारे रस्ते असो वा नाशिककडून रामकुंड, गांधीतलाव वा रोकडोबा मैदानाकडे जाणारे रस्ते असो दोन्ही बाजूंनी उताराच्या रस्त्यांशिवाय पर्यायच नसताना अशा उताराच्या रस्त्यांवर भाविकांना अडवून धरून नंतर अचानक त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केल्यास स्रानासाठी अधीर झालेल्या लाखो भाविकांमध्ये धावपळ व त्यातून चेंगराचेंगरी होण्याचीच शक्यता अधिक असल्याचे या भागातील जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत, त्यातून अनुचित घटना घडण्याचीच भीती अधिक दिसू लागली आहे.