शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता

By admin | Updated: April 22, 2015 01:36 IST

एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता

नाशिक : खांब आहेत, पण दिवे नाहीत आणि दिवे आहेत, तर लागत नाहीत अशी स्थिती शहरात सर्वत्र असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या महापालिकेच्या ताब्यात आठवडाभरात विद्युत साहित्य उपलब्ध होणार असून, एप्रिलअखेर बंद पथदीप उजळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, न्यायप्रविष्ट असलेल्या एलइडीबाबतचा घोळ अद्यापही मिटलेला नसून वकिलांशी चर्चेच्या पातळीवरच प्रश्न फिरत आहे. महापालिकेने शहरात सुमारे ६४ हजार एलइडी फिटिंग्ज लावण्याचा ठेका दिला होता; परंतु त्याच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केले गेल्याने प्रशासनाने काम थांबविले होते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले असून, प्रशासनाकडून वकिलांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. एलइडीप्रकरण थंडावले असतानाच शहरातील ठिकठिकाणी पथदीप बंद पडल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी कमालीचा संताप आहे. शहरात अनेक भागांमध्ये विशेषत: नववसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पथदीप बंद आहेत. काही भागात खांबावरील दिव्यांचा प्रकाश मंद पडतो, तर काही भागात अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेच्या उद्यानांमध्येही उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील दिवे बंद स्थितीत आहेत.