शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

पूर्व भागातील उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:14 IST

यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्णात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर पीकपेरणी झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे.

नाशिक : यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्णात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर पीकपेरणी झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे. नाशिक जिल्ह्णात खरीप पेरणीचे ६.५३ लाख हेक्टर इतके क्षेत्र असून, त्यापैकी साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पश्चिम भागात भात, नागली, वरई या पिकांची पुनर्लागवड करण्यात येऊन पिके वाढीच्या स्थितीत आली आहेत. पूर्व भागात पेरणी पूर्ण होऊन बाजरी, मका व भुईमूग या पिकांनी फुलोरा धरून त्यात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्णात ४७२ हेक्टर इतके क्षेत्र कापसाचे असून, त्याचीही लागवड होऊन त्याची अवस्था फूल व पाने लागण्याच्या स्थितीत आहे. उडीद व मूग या पिकांनी शेंगा पकडून हे पीक आता काही दिवसांनी काढणीला येतील.यंदा जूनमध्येच पावसाचे आगमन झाले व जुलै महिन्यातही त्याने आपला मुक्काम ठोकला, परंतु आॅगस्टच्या तीन आठवडे पावसाने पाठ फिरविली असे असले तरी, जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातील पूर्व भागातील मालेगाव, बागलाण, देवळा या तालुक्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दिलेल्या दीर्घकालीन ओढीमुळे त्याचा परिणाम या भागातील पिकांवर झाला आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.सोयाबीन, उसावर कीडजिल्ह्णात सोयाबीन व ऊस लागवडीचेही क्षेत्र असून, यंदा शेतकºयांचा सोयाबीन लागवडीकडे चांगला कल आहे. मात्र पावसाच्या कमी, अधिक येण्याने सोयाबीनने शेंगा धरल्या व पक्वतेच्या अवस्थेत असल्या तरी, सोयाबीनचे पाने खाणाºया अळींचा काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकावर लोकरी मावा व पांढºया माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने या दोन्ही पिकांचा धोका वाढला आहे.