शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:14 IST

यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्णात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर पीकपेरणी झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे.

नाशिक : यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्णात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर पीकपेरणी झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे. नाशिक जिल्ह्णात खरीप पेरणीचे ६.५३ लाख हेक्टर इतके क्षेत्र असून, त्यापैकी साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पश्चिम भागात भात, नागली, वरई या पिकांची पुनर्लागवड करण्यात येऊन पिके वाढीच्या स्थितीत आली आहेत. पूर्व भागात पेरणी पूर्ण होऊन बाजरी, मका व भुईमूग या पिकांनी फुलोरा धरून त्यात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्णात ४७२ हेक्टर इतके क्षेत्र कापसाचे असून, त्याचीही लागवड होऊन त्याची अवस्था फूल व पाने लागण्याच्या स्थितीत आहे. उडीद व मूग या पिकांनी शेंगा पकडून हे पीक आता काही दिवसांनी काढणीला येतील.यंदा जूनमध्येच पावसाचे आगमन झाले व जुलै महिन्यातही त्याने आपला मुक्काम ठोकला, परंतु आॅगस्टच्या तीन आठवडे पावसाने पाठ फिरविली असे असले तरी, जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातील पूर्व भागातील मालेगाव, बागलाण, देवळा या तालुक्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दिलेल्या दीर्घकालीन ओढीमुळे त्याचा परिणाम या भागातील पिकांवर झाला आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.सोयाबीन, उसावर कीडजिल्ह्णात सोयाबीन व ऊस लागवडीचेही क्षेत्र असून, यंदा शेतकºयांचा सोयाबीन लागवडीकडे चांगला कल आहे. मात्र पावसाच्या कमी, अधिक येण्याने सोयाबीनने शेंगा धरल्या व पक्वतेच्या अवस्थेत असल्या तरी, सोयाबीनचे पाने खाणाºया अळींचा काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकावर लोकरी मावा व पांढºया माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने या दोन्ही पिकांचा धोका वाढला आहे.