शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:54 IST

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो. देवळा : पाऊस लांबणीवर; मृग नक्षत्र संपत आल; शेतकरी चिंतित

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.गत वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती होती, त्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पुरेशा पावसाअभावी वाया गेले. यामुळे दुष्काळाचा सामना बळीराजाला करावा लागला होता. असे असतानाही हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी निश्चितच पाऊस चांगला होईल या अपेक्षेने रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी चालू केली होती. संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून पावसाळा सुरू होऊन दोन आठवड्यड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मिहन्याच्या शेवटपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र या वर्षाचा खरीप हंगाम ही पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे उशिरा केलेल्या पेरणीमुळे उत्पन्नात घट होत असल्यामुळे केलेला खर्चही हाती लागत नाही. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.चालू खरीप हंगामासाठी देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्र तयार असून त्यात तृणधान्य २५७५०, कडधान्य १८२०, गळीत धान्य १४४०, खरीपाचा कांदा ४५००, भाजीपाला ७५० व इतर पिके ३०० असे एकूण ३५१०० हेक्टर क्षेत्र खिरपाचे तयार आहे त्यात सर्वसाधारणपणे ३२९०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होऊ शकते. मात्र पावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो.