शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:54 IST

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो. देवळा : पाऊस लांबणीवर; मृग नक्षत्र संपत आल; शेतकरी चिंतित

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.गत वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती होती, त्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पुरेशा पावसाअभावी वाया गेले. यामुळे दुष्काळाचा सामना बळीराजाला करावा लागला होता. असे असतानाही हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी निश्चितच पाऊस चांगला होईल या अपेक्षेने रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी चालू केली होती. संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून पावसाळा सुरू होऊन दोन आठवड्यड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मिहन्याच्या शेवटपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र या वर्षाचा खरीप हंगाम ही पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे उशिरा केलेल्या पेरणीमुळे उत्पन्नात घट होत असल्यामुळे केलेला खर्चही हाती लागत नाही. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.चालू खरीप हंगामासाठी देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्र तयार असून त्यात तृणधान्य २५७५०, कडधान्य १८२०, गळीत धान्य १४४०, खरीपाचा कांदा ४५००, भाजीपाला ७५० व इतर पिके ३०० असे एकूण ३५१०० हेक्टर क्षेत्र खिरपाचे तयार आहे त्यात सर्वसाधारणपणे ३२९०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होऊ शकते. मात्र पावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो.