शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

खरीपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:54 IST

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो. देवळा : पाऊस लांबणीवर; मृग नक्षत्र संपत आल; शेतकरी चिंतित

देवळा : मृग नक्षत्र संपत आले, परंतु अद्याप पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे गतवर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकरीवर्ग मोठ्या आशेने पावसाच्या आगामणाची वाट पहात आहे. चालू वर्षी पाऊस लांबल्यामुळे खरीप पिकांचे नियोजन कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे.देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पूर्व मशागतीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेले आहेत.गत वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती होती, त्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पुरेशा पावसाअभावी वाया गेले. यामुळे दुष्काळाचा सामना बळीराजाला करावा लागला होता. असे असतानाही हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी निश्चितच पाऊस चांगला होईल या अपेक्षेने रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी चालू केली होती. संपूर्ण तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून पावसाळा सुरू होऊन दोन आठवड्यड्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मिहन्याच्या शेवटपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र या वर्षाचा खरीप हंगाम ही पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे उशिरा केलेल्या पेरणीमुळे उत्पन्नात घट होत असल्यामुळे केलेला खर्चही हाती लागत नाही. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.चालू खरीप हंगामासाठी देवळा तालुक्यात ३५१०० हेक्टर क्षेत्र तयार असून त्यात तृणधान्य २५७५०, कडधान्य १८२०, गळीत धान्य १४४०, खरीपाचा कांदा ४५००, भाजीपाला ७५० व इतर पिके ३०० असे एकूण ३५१०० हेक्टर क्षेत्र खिरपाचे तयार आहे त्यात सर्वसाधारणपणे ३२९०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होऊ शकते. मात्र पावसाने ओढ दिल्यास खरीप हंगामा वर मोठा परिणाम होऊ शकतो.