शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

उद्योग सुरू नसलेले २२ भूखंड ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:47 IST

उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता नव्याने उद्योग सुरू करणाºयांना भूखंड उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सातपूर : उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता नव्याने उद्योग सुरू करणाºयांना भूखंड उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अनेक लोकांनी भूखंड घेतले होते. नियमाप्रमाणे भूखंडावर बांधकाम करून उत्पादन प्रक्रि या सुरू करणे अपेक्षित होते. परंतु घेतलेल्या भूखंडाचा वापर करण्याऐवजी हे भूखंड वर्षानुवर्षे रिक्त ठेवण्यात आले होते. एकीकडे नवीन उद्योगांसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना नवीन भूखंड मिळत नसताना दुसरीकडे अशाप्रकारचे भूखंड अडकवून ठेवण्यात येत असल्याने विकासही खुंटला आहे. त्यामुळे भूखंड विकसित न करणाºया अशा भूखंडधारकांना एमआयडीसीकडून उद्योग उभारणीसाठी वेळोवेळी सूचित करून संधी देण्यात आली होती.शिवाय अशा लोकांसाठी शासनाने ‘उद्योग संजीवनी’ योजनादेखील आणली होती. तरीही अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. उलट उद्योग व्यवसायाच्या नावाखाली सवलतीच्या दरात भूखंड घेऊन चढ्या भावाने भूखंड विक्री करण्याचे प्रकार वाढले होते. मात्र ज्या उद्देशाने भूखंड घेतला तो उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने कडक पावले उचलण्यास सुरु वात केली.२०१३ पूर्वी इमारत पूर्णत्वाचा दाखला न घेणाºया व उद्योग संजीवनी योजनेचा लाभ न घेणाºया अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ३२० भूखंडधारकांना औद्योगिक विकास महामंडळाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यातील २०० भूखंडधारकांचा समावेश होता. या नोटिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून एमआयडीसीने २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. तर काही भूखंडधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या या कारवाईचे उद्योग क्षेत्रात स्वागत केले जात आहे.