शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ४० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:09 IST

नाशिक : मागील एका आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यात येणाऱ्या ...

नाशिक : मागील एका आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन ते तीन नमुन्यांपैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अर्थात पाॅझिटिव्हिटी रेट अवघ्या पंधरा दिवसांमध्ये तब्बल ४० टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर चाचण्यांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. गत महिन्यात सुमारे १० ते १५ टक्क्यांपर्यंत असलेला पॉझिटिव्हिटी रेट मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मोठ्या वेगाने वाढू लागला आहे. पहिल्या आठवड्यात साधारण २० टक्क्यांवर असलेल्या या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये थेट दुपटीने वाढ होऊन हे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले आहे.

इन्फो

सप्टेंबरमध्ये होते १५ टक्के

गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा उच्चांक सप्टेंबर महिन्यात झाला होता. त्या सप्टेंबर महिन्यात आणि गतवर्षात बाधितसंख्येने एकदाच २ हजारांचा आकडा ओलांडला होता. तेव्हादेखील कोरोना अहवाल बाधित येण्याचे प्रमाण अवघे १५ टक्क्यांवर होते. त्या तुलनेत सध्याचे बाधित प्रमाण अडीच पटींहून अधिक वाढले असल्याने त्यातील तीव्रता वाढली आहे. गतवर्षी सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याचा होता. त्यावेळी ते प्रमाण ३७ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, नाशिकमध्ये तर मार्चच्या महिन्यातच हे प्रमाण चाळीस टक्क्यांवर पोहोचले असल्याने अजून त्यात किती भर पडणार, अशी चिंता जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला वाटू लागली आहे.

इन्फो

मृत्यूसंख्येतील वाढ चिंताजनक

कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दरातील वाढीबरोबरच मृत्यूसंख्येतील वाढही अधिक मोठ्या चिंतेचे कारण ठरू लागली आहे. कोरोना बळींची संख्या सलगपणे वाढणे ही प्रशासनासह नागरिकांच्या दृष्टीने अधिक गंभीर बाब ठरत आहे. कोरोनाबळी दहा ते वीसवर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे गतवर्षी सप्टेंबरमध्येच होते. मात्र, आता जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसांत बळींची संख्या १५ वरून शनिवारी थेट २५ वर पोहोचली आहे. त्यात अजून भर पडणे ही अत्यंत धोकादायक वाटचाल ठरू लागली आहे.