शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर चाचण्यांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने ...

कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर चाचण्यांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १५ टक्क्यांपर्यंत असलेला पॉझिटिव्हिटी रेट मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मोठ्या वेगाने वाढू लागला आहे. मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी असले तरी गतवर्षातील सर्वोच्च पॉझिटिव्हिटीपेक्षा हे ५ टक्क्यांनी अधिक आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारण २० ते २२ टक्क्यांवर असलेल्या या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मार्चअखेरीस आणि एप्रिलच्या प्रारंभापर्यंत दुपटीने वाढ होऊन हे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले होते. त्यात एप्रिलच्या मध्यावर काहीशी घट होण्यास प्रारंभ झाला असला तरी ते प्रमाण एप्रिलअखेरपर्यंत २८ टक्क्यांच्या आसपासच राहात होते. मे महिन्याच्या प्रारंभी अद्यापही धोकादायक पातळीवर कायम आहे. सध्याचा एकूण बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट २०.०६ टक्के असून, हा पॉझिटिव्हिटी रेट काहीसा कमी असला तरी तो गतवर्षीच्या सर्वोच्चपेक्षा अधिक पातळीवर कायम आहे.

इन्फो

गतवर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १५ टक्के

गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा उच्चांक सप्टेंबर महिन्यात झाला होता. त्या सप्टेंबर महिन्यात आणि गतवर्षात बाधितसंख्येने एकदाच २ हजारांचा आकडा ओलांडला होता. तेव्हादेखील कोरोना अहवाल बाधित येण्याचे प्रमाण अवघे १५ टक्क्यांवर होते. त्या तुलनेत सध्याचे बाधित प्रमाण वाढले असल्याने त्यातील तीव्रता अद्यापही आहे. गतवर्षी सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याचा होता. त्या वेळी ते प्रमाण ३७ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, नाशिकमध्ये तर मार्चच्या महिन्यातच हे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले होते. अद्यापही हे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याने ते प्रमाण लवकरात लवकर कमी करण्यावर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग झटत आहे.

इन्फो

मृत्युसंख्येतील वाढ चिंताजनक

कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दरातील वाढीबरोबरच मृत्युसंख्येतील वाढही अधिक मोठ्या चिंतेचे कारण ठरू लागली आहे. कोरोना बळींची संख्या सलगपणे वाढणे ही प्रशासनासह नागरिकांच्या दृष्टीने अधिक गंभीर बाब ठरत आहे. गतवर्षी कोरोनाच्या बहराच्या काळात सप्टेंबरमध्येच कोरोनाबळी दहा ते वीसवर राहण्याचे प्रमाण होते. मात्र, आता जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासून सातत्याने ३० ते ४० हून अधिक राहात आहे. बळींची ही सातत्यपूर्ण वाटचाल नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे.

ग्राफ

१ एप्रिल ४१.५४ टक्के

८ एप्रिल ४१.५२ टक्के

१५ एप्रिल ३१.८६ टक्के

२१ एप्रिल ३०.७१ टक्के

२८ एप्रिल २९.१० टक्के

१ मे २४.६० टक्के

२ मे २२.२१ टक्के

३ मे २०.०६ टक्के