शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

पूल बनला धोकादायक

By admin | Updated: April 22, 2017 00:47 IST

भगूर : दारणा नदीवरील भगूर-पांढुर्ली-सिन्नर यांना जोडणाऱ्या पुलाचे खांब भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत.

भगूर : दारणा नदीवरील भगूर-पांढुर्ली-सिन्नर यांना जोडणाऱ्या पुलाचे खांब भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. त्यामुळे सदर पुलाचे तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.भगूर गावाला सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने नगरसेवक कविता यादव यांनी नदीपात्राची पाहणी केली असता पुलाखालील भराव वाहून गेल्याने खांब उघडे पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खांबाच्या आतील लोखंडी अँगल्स दिसत असल्याने सदर खांब अत्यंत धोकेदायक असल्याने लक्षात येते. यंदा नदीपात्र कोरडे ठाक पडल्याने सदर बाब उघडकीस आली आहे.सध्या हा पूल मागील व पुढील तीन पिलर खांबावर आधांतरित उभा आहे, तर मधल्या निखळत चाललेल्या खांबाकडे लक्ष न दिल्यास दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीला रोटेशनने पाणी सोडल्यास किंवा पावसाळ्यात पाण्याखाली पिलर गेल्यास तग धरून असलेला लोखंडी खांब केव्हाही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाने भगूर दारणा नदीच्या पुलाची संपूर्ण पाहणी करून सहाही पिलरची डागडुजी करून मजबूत करावा, अशी मागणी नगरसेविका कविता यादव, आठवडे बाजार मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. दारणा नदीवर अंदाजे ५० वर्षांपूर्वी दारणा नदीवर पूल बांधलेला आहे. या पुलावरून सिन्नर तालुक्यातील शेकडो गावाची नाशिकरोडकडे शेतीमाल, औद्योगिक माल वाहतूक दररोज सुरू असते. सिन्नर-इगतपुरी-नाशिक या तीन तालुक्यांच्या हा मुख्य वाहतूक पूल महत्त्वाचा झाला आहे. या पुलावरील अवजड वाहतूक असल्याने धोका अधिकच वाढला आहे. (वार्ताहर)भराव वाहून गेल्याने पुलाचे पिलर असे धोकादायक बनले आहेत.