शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पूल बनला धोकादायक

By admin | Updated: April 22, 2017 00:47 IST

भगूर : दारणा नदीवरील भगूर-पांढुर्ली-सिन्नर यांना जोडणाऱ्या पुलाचे खांब भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत.

भगूर : दारणा नदीवरील भगूर-पांढुर्ली-सिन्नर यांना जोडणाऱ्या पुलाचे खांब भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. त्यामुळे सदर पुलाचे तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.भगूर गावाला सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने नगरसेवक कविता यादव यांनी नदीपात्राची पाहणी केली असता पुलाखालील भराव वाहून गेल्याने खांब उघडे पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खांबाच्या आतील लोखंडी अँगल्स दिसत असल्याने सदर खांब अत्यंत धोकेदायक असल्याने लक्षात येते. यंदा नदीपात्र कोरडे ठाक पडल्याने सदर बाब उघडकीस आली आहे.सध्या हा पूल मागील व पुढील तीन पिलर खांबावर आधांतरित उभा आहे, तर मधल्या निखळत चाललेल्या खांबाकडे लक्ष न दिल्यास दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीला रोटेशनने पाणी सोडल्यास किंवा पावसाळ्यात पाण्याखाली पिलर गेल्यास तग धरून असलेला लोखंडी खांब केव्हाही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाने भगूर दारणा नदीच्या पुलाची संपूर्ण पाहणी करून सहाही पिलरची डागडुजी करून मजबूत करावा, अशी मागणी नगरसेविका कविता यादव, आठवडे बाजार मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. दारणा नदीवर अंदाजे ५० वर्षांपूर्वी दारणा नदीवर पूल बांधलेला आहे. या पुलावरून सिन्नर तालुक्यातील शेकडो गावाची नाशिकरोडकडे शेतीमाल, औद्योगिक माल वाहतूक दररोज सुरू असते. सिन्नर-इगतपुरी-नाशिक या तीन तालुक्यांच्या हा मुख्य वाहतूक पूल महत्त्वाचा झाला आहे. या पुलावरील अवजड वाहतूक असल्याने धोका अधिकच वाढला आहे. (वार्ताहर)भराव वाहून गेल्याने पुलाचे पिलर असे धोकादायक बनले आहेत.